शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

रावणवाडीत मूलभूत साेयी-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST

संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या रावणवाडीत माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष ...

संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या रावणवाडीत माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आमदार इंदूताई नाकाडे यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही. १९९२ मध्ये गावाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता कच्च्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत मुख्य मार्गाशी रस्ता जोडण्याचे व त्यावर डांबरीकरणाचे काम झाले नाही.

या गावाने जंगलाचे संरक्षण व संवर्धन करून उपलब्ध जंगलाची व्याप्ती कायम ठेवली असून, संपूर्ण गाव धूरमुक्त झाले आहे. गावालगत असलेल्या २० हेक्टरमधील तलावामुळे सिंचनाची सोय झाली आहे. या गावाने आदिवासी पारंपरिक रेला नृत्याचे जतन करून आपली संस्कृती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. देसाईगंज येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये येथील नागरिक सहभाग घेतात. गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय, प्रशासकीय स्तरावरून यथायोग्य प्रयत्न केल्या जात नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास रखडला आहे. हे गाव आदिवासी असतानाही विकासापासून वंचित आहे.

बाॅक्स ......

स्वस्त धान्यासाठी ६ किमीची पायपीट

आरोग्य, शैक्षणिक सुविधेचा अभाव

जंगलव्याप्त या गावात एका अंगणवाडी व्यतिरिक्त शिक्षणाची कुठलीही सोय उपलब्ध नाही. येथील विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील कोरेगाव येथे शिक्षण घेण्याकरिता वन्यप्राण्यांचा धोका पत्करून जावे लागते. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. संपूर्ण आदिवासी गाव असूनही या गावाचा समावेश पेसा क्षेत्रात नाही. याशिवाय गावातील एकाही नागरिकाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. अनेक कुटुंब पडक्या कौलारू घरातच वास्तव्य करीत आहेत. येथील नागरिकांना कोरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणावे लागते. याशिवाय आरोग्य सेवेसाठी सहा किमीची पायपीट करून कोरेगावला जावे लागते.