शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

रावणवाडीत मूलभूत साेयी-सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST

संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या रावणवाडीत माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष ...

संपूर्ण आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या रावणवाडीत माडिया गोंड जातीचे २७५ लोक वास्तव्यास आहेत. गावात एकूण २९ कुटुंब आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आमदार इंदूताई नाकाडे यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली नाही. १९९२ मध्ये गावाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता कच्च्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत मुख्य मार्गाशी रस्ता जोडण्याचे व त्यावर डांबरीकरणाचे काम झाले नाही.

या गावाने जंगलाचे संरक्षण व संवर्धन करून उपलब्ध जंगलाची व्याप्ती कायम ठेवली असून, संपूर्ण गाव धूरमुक्त झाले आहे. गावालगत असलेल्या २० हेक्टरमधील तलावामुळे सिंचनाची सोय झाली आहे. या गावाने आदिवासी पारंपरिक रेला नृत्याचे जतन करून आपली संस्कृती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. देसाईगंज येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये येथील नागरिक सहभाग घेतात. गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय, प्रशासकीय स्तरावरून यथायोग्य प्रयत्न केल्या जात नाहीत. त्यामुळे या गावाचा विकास रखडला आहे. हे गाव आदिवासी असतानाही विकासापासून वंचित आहे.

बाॅक्स ......

स्वस्त धान्यासाठी ६ किमीची पायपीट

आरोग्य, शैक्षणिक सुविधेचा अभाव

जंगलव्याप्त या गावात एका अंगणवाडी व्यतिरिक्त शिक्षणाची कुठलीही सोय उपलब्ध नाही. येथील विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील कोरेगाव येथे शिक्षण घेण्याकरिता वन्यप्राण्यांचा धोका पत्करून जावे लागते. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. संपूर्ण आदिवासी गाव असूनही या गावाचा समावेश पेसा क्षेत्रात नाही. याशिवाय गावातील एकाही नागरिकाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. अनेक कुटुंब पडक्या कौलारू घरातच वास्तव्य करीत आहेत. येथील नागरिकांना कोरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणावे लागते. याशिवाय आरोग्य सेवेसाठी सहा किमीची पायपीट करून कोरेगावला जावे लागते.