शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मांड्रा गावात मूलभूत सोईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:27 IST

तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : इमारतीअभावी ग्राम पंचायत कार्यालय अंगणवाडी केंद्रात; गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे.अहेरी तालुक्यात ४० ग्राम पंचायती आहेत. मांड्रा व मोदुमडगू या दोन गावासाठी एकच ग्राम पंचायत आहे. ग्राम पंचायत अंतर्गत ९९८ इतकी लोकसंख्या आहे. शासनामार्फत प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला जातो. परंतु शासनाच्या या प्रयत्नानंतरही मांड्रा ग्रामपंचायत विकासापासून कोसोदूर असून समस्यांचा विळख्यात सापडली आहे. गावात जायला कच्चा रस्ता असून रस्त्यावर तुटलेला पूल आहे. या पुलाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने पावसाळ्यात पुरामुळे गावाचा संपर्क तुटतो. तरीसुद्धा महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कमलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात अद्यापही एसटी महामंडळची बस पोहोचली नाही. खाजगी वाहनांचा आधार घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी मांड्रा व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.दोन्ही परिचारिका गैरहजरकमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांड्रा येथे उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र, येथील उपकेंद्र बंद राहत असल्याने रूग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. उपकेंद्रात एक नियमित परिचारिका व एक एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नियमित परिचारिका मागील दीड ते दोन वर्षांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले आणि कंत्राटी परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे. या उपकेंद्रातील दोन्ही परिचारिका विविध कारणांनी गैरहजर असतानाही येथे दुसऱ्या परिचारिकेची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती का करण्यात आली नाही, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडितमांड्रा येथील वीज पुरवठा मागील सहा दिवसांपासून खंडित असल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. विशेष म्हणजे या भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. सायंकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस तो पूर्ववत होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय या भागात अनेक सोयीसुविधांचा अभाव असतानाही शासन, प्रशासनाचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.