शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

मांड्रा गावात मूलभूत सोईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:27 IST

तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : इमारतीअभावी ग्राम पंचायत कार्यालय अंगणवाडी केंद्रात; गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा येथील ग्राम पंचायत कार्यालयाला स्वतंत्र इमारत नसल्याने कारभार अंगणवाडीच्या इमारतीतून चालविला जात आहे. विविध समस्यांनी येथील ग्राम पंचायत ग्रस्त असून गावाचाही विकास खोळंबला आहे.अहेरी तालुक्यात ४० ग्राम पंचायती आहेत. मांड्रा व मोदुमडगू या दोन गावासाठी एकच ग्राम पंचायत आहे. ग्राम पंचायत अंतर्गत ९९८ इतकी लोकसंख्या आहे. शासनामार्फत प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला जातो. परंतु शासनाच्या या प्रयत्नानंतरही मांड्रा ग्रामपंचायत विकासापासून कोसोदूर असून समस्यांचा विळख्यात सापडली आहे. गावात जायला कच्चा रस्ता असून रस्त्यावर तुटलेला पूल आहे. या पुलाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने पावसाळ्यात पुरामुळे गावाचा संपर्क तुटतो. तरीसुद्धा महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कमलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात अद्यापही एसटी महामंडळची बस पोहोचली नाही. खाजगी वाहनांचा आधार घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी मांड्रा व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.दोन्ही परिचारिका गैरहजरकमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांड्रा येथे उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र, येथील उपकेंद्र बंद राहत असल्याने रूग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. उपकेंद्रात एक नियमित परिचारिका व एक एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नियमित परिचारिका मागील दीड ते दोन वर्षांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले आणि कंत्राटी परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे. या उपकेंद्रातील दोन्ही परिचारिका विविध कारणांनी गैरहजर असतानाही येथे दुसऱ्या परिचारिकेची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती का करण्यात आली नाही, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडितमांड्रा येथील वीज पुरवठा मागील सहा दिवसांपासून खंडित असल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. विशेष म्हणजे या भागात लाईनमन मुख्यालयी राहत नाही. सायंकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तीन ते चार दिवस तो पूर्ववत होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय या भागात अनेक सोयीसुविधांचा अभाव असतानाही शासन, प्रशासनाचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.