शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

संदेशवाहक मोबाईलमधून जुळताहेत कोवळी हृदयं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:35 IST

अतुल बुराडे विसोरा : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे अन् आमचे सेम असते’ अशा सोप्या शब्दात कवी ...

अतुल बुराडे

विसोरा : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे अन् आमचे सेम असते’ अशा सोप्या शब्दात कवी प्रेमाचे वर्णन करतात. कालच्या आणि आजच्या पिढीतील हे प्रेम ‘सेम’ असले तरी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र खूप बदलली आहे. आताच्या प्रेमविरांना प्रेम व्यक्त करण्यासाठी १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुद्धा गरज पडत नाही. त्यांचे हे काम मोबाईलने अतिशय सोपे केले आहे. शहरीच नाही तर आता ग्रामीण भागातही त्यामुळे प्रेम व्यक्त करण्याचे आणि कोणत्या कारणावरून बिनसले म्हणून ब्रेकअप होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

प्रेम म्हणजे मन आणि हृदयाला अतिशय आनंद देणारी कोमल भावना. आवड, आकर्षण, प्रेम वाटले तरी हृदयातल्या नाजूक भावना ओठांवर वा कागदांवर येऊन बाहेर पडणे अशक्यप्राय होते. त्यामुळे मनातल्या भावना जोडीदाराजवळ व्यक्त करणे मोठे जिकरीचे काम असायचे. त्यात अनेक दिवस निघून जात. कधी-कधी तर मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही म्हणून ते प्रेम मनातल्या मनातच राहात असे. आता मात्र मोबाईलने हे काम सोपे केले आहे. फोन कॉल करून थेट बोला किंवा एखादा मॅसेज टाका, एवढेच काय प्रेमाचा अंदाज घेण्यासाठी ईमोजी (चिन्ह)चा वापरही युवक-युवती मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे अनेकांचे सूत जुळवण्यात मोबाईलच ‘किंगमेकर’ झाला आहे.

(बॉक्स)

घरातील मंडळी बेखबर

बाहेरच्या जगाचा प्रभाव आता ग्रामीण भागातील मुला-मुलींवरही पडल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही तर अगदी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचेही मोबाईलच्या माध्यमातून सूत जुळून ते घरातील मंडळींची नजर चुकवून ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करताना दिसतात. कुठे जायचे, कधी भेटायचे यापासून तर डोळ्यासमोर पुस्तक पकडून गुपचूपपणे मोबाईलमधून चॅटिंग करणाऱ्या कोवळ्या प्रेमविरांची त्यांच्या घरातील मंडळींनाच खबर नसते. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी त्यांच्यावर योग्य पद्धतीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

(बॉक्स)

अन् मोबाईलच ठरतो खलनायक

२० वर्षांपूर्वी एखाद्यावर प्रेम जडले तर ते व्यक्त करण्यासाठी मित्र-मैत्रीण किंवा कागदाच्या चिठ्ठीचा सहारा घ्यावा लागत होता. संदेशवाहक म्हणून ते महत्त्वाची भूमिका वठवत असत. आता मानवी संदेशवाहकाची गरजच उरली नाही. त्यांची जागा मोबाईल आणि आता स्मार्टफोनने घेतली. पण अनेकांच्या प्रेमात स्मार्टफोनच खलनायक ठरून प्रेम तुटण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. जोडीदार रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन होता तर कोणाशी चॅटिंग सुरू होती, माझ्या मॅसेजला लवकर उत्तर का दिले नाही, फोन व्यस्त असला तर कोणाशी बोलत होतीस, असे प्रश्न जोडीदाराकडून वारंवार केले जातात. त्यातून गैरसमज वाढून प्रेमाचा विचका होत आहे.