शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोटगूलची आश्रमशाळा अजूनही विद्यार्थ्यांनाविना ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:11 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली.

ठळक मुद्देभुताटकी प्रकरण : देवपूजा केल्यावरच मुलामुलींना पाठविणार, पालकांचा निर्धार

लिकेश अंबादे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्याच्या कोटगूल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत भूत-पिशाच्चच्या अफवेचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनासह अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही तिकडे धाव घेतली. पण येथील विद्यार्थी सोमवारीसुद्धा आश्रमशाळेत परतले नव्हते. सदर आश्रमशाळेत देवपूजा केल्यानंतरच आपल्या पाल्यांना पाठविणार, असा निर्धार पालकांनी केला आहे.कोटगूल आश्रमशाळेत १९ जुलै रोजी वसतिगृहात निवासी राहणारी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी पिंटी धनेश्री कुरचामी रा. टेकामेटा हिची प्रकृती सर्वप्रथम बिघडली. ती सारखी रडत होती. त्यामुळे तिला गडचिरोलीच्या रूग्णालयात हलविण्यात आले. तिला नेमके काय झाले हे कळतच नसल्याने आश्रमशाळेत भूत-पिशाच्च तर नाही ना? अशी भिती आश्रमशाळेतील मुलामुलींमध्ये निर्माण झाली. दुसºया दिवशी २० जुलैला पुन्हा एका मुलीने रडणे, हातपाय इकडे तिकडे मारण्यास सुरूवात केली. आठवीची विद्यार्थिनी अनुकला ताराम व अंकिता गेंदलाल टेकाम या मुलींचीही प्रकृती बिघडली. सदर मुलीचे हे विचित्र वागणे पाहून दुसºया मुलींनीही तशाच प्रकारची कृती करण्यास सुरूवात केली. हा प्रकार पाहून भुताटकीची बाधा झाली, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटू लागला. त्यामुळे पालकांच्या आग्रहावरून विद्यार्थ्यांना शनिवारी त्यांच्या घरी सोडण्यात आले.त्यानंतर सोमवारी २२ जुलै रोजी सदर आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भुरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष उद्धव डांगे, विलास निंबोरकर, विठ्ठल कोठारे, सुधाकर दुधबावरे व सहायक प्रकल्प अधिकारी आर. के. लांडे यांना शाळेच्या ठिकाणी बोलावून घेतले. गावातील नागरिक व टिपागड विद्यालयातील ३० ते ४० विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत बोलावून अंधश्रध्दा निर्मूलन जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पालकांचे मनपरिवर्तन झाले नाही. २२ ते २५ गावातील विद्यार्थी कोटगूलच्या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. १८ गावांचा मिळून एक पुजारी आहे. सदर पुजाºयाला आश्रमशाळेत बोलावून देवपूजा करू, त्यानंतर आम्ही आमच्या पाल्यांना आश्रमशाळेत पाठवू किंवा आणून देऊ, असे पालकांनी शालेय प्रशासनाला सांगितले.अन् विद्यार्थ्यांना पालकांनी घरी नेलेकोटगूलच्या या आश्रमशाळेत एकूण २५९ विद्यार्थी दाखल आहेत. सदर घटनेच्या दिवशी २११ विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रकार विशेष करून मुलींच्या वसतिगृहात घडला. विद्यार्थिनींनी ही माहिती अधीक्षक व अधिक्षिका तसेच मुख्याध्यापकांना दिली. त्यानंतर येथील मुख्याध्यापकाने ही माहिती प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाºयांना कळविली. तसेच गावातील प्रतिष्ठीत लोकांना बोलावून सदर प्रकरणाबाबत विचारविनीमय करण्यात आला.गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्ल्यू. के. कोडापे व एस. एम. दबा यांनी सदर आश्रमशाळा गाठून तेथील पालकांशी चर्चा केली. मात्र काय झाले हे सांगण्यासाठी अधिकाºयांसमोर विद्यार्थ्यांना नेणार नाही, असे पालकांनी सांगितले. दरम्यान अधिकारी गडचिरोलीला निघून गेल्यावर पालकांनी विद्यार्थ्यांना घरी सोडण्याबाबत मुख्याध्यापकांवर दबाव टाकला. मुख्याध्यापक एस.डी.भुरे यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास टॅक्सी करून शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना घरी पोहचवून दिले.आश्रमशाळेतील कथित भुताटकीच्या प्रकरणानंतर गावातील नागरिक व पालकांची बैठक घेतली. त्यात पालकांनी आम्ही आमच्या मुलामुलींना दोन ते तीन दिवसात आश्रमशाळा व वसतिगृहात परत पाठविणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमधील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोटगूल हे गाव अतिसंवेदनशील भागात असल्यामुळे ग्रामस्थ व पालकांसोबत मिळून आश्रमशाळेतील मुलामुलींना सदर शाळेत परत आणता येईल.- आर. के. लाडे,सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी वि.प्र., गडचिरोली