शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सात वर्षानंतर उजळणार कोहकापरी गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:53 IST

दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या पाठपुराव्याला यश : नवीन खांब लावून वीज पुरवठा पूर्ववत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड (गडचिरोली) : दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.आठ वर्षांपूर्वी पल्ली गावात वीज पुरवठा करण्यासाठी कोहकापरी या गावातूनच तारांची जोडणी करून वीज पुरवठा घेतला होता. त्या पल्ली गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे, मात्र सात वर्षांपूर्वी कोहकापरी गावातील वीज तारांवर पावसाळ्यात मोठे झाड पडले. तेव्हापासून वीज पुरवठा खंडित झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा महावितरण कंपनीकडे तक्रार केली. मात्र गावात एकही वीज ग्राहक नसल्याने वीज पुरवठा सुरू करण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे मागील सात वर्षांपासून सदर गाव अंधाराचा सामना करीत आहे.ही बाब ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दीपक दळवी यांच्या लक्षात आली. त्यांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गावात ग्राहक असण्याची अट वीज कंपनीने टाकली. पोलिसांनी ग्रामसभा घेऊन गावकºयांना वीज जोडणी घेण्यास सांगितले. त्यानुसार गावातील नागरिकही तयार झाले. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला. आता वीज कंपनीने विजेचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. गावात नवीन खांब बसविले जात आहेत. त्याचबरोबर नवीन ट्रान्सफार्मरही लावले जाणार आहे. त्यामुळे लवकरच या गावातील रस्ते आणि घरेही विजेच्या प्रकाशाने उजाडणार आहे.केहकापरीला जाण्यासाठी रस्ता नाहीपोलिसांच्या मदतीने केहकापरी गावाचा वीज पुरवठा सात वर्षानंतर सुरू होणार आहे, मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटेचा आधार घेत गाव गाठावे लागते. घनदाट जंगलात असलेले सदर गाव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विकासासाठी आलेला निधी जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.