शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षानंतर उजळणार कोहकापरी गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:53 IST

दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या पाठपुराव्याला यश : नवीन खांब लावून वीज पुरवठा पूर्ववत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड (गडचिरोली) : दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.आठ वर्षांपूर्वी पल्ली गावात वीज पुरवठा करण्यासाठी कोहकापरी या गावातूनच तारांची जोडणी करून वीज पुरवठा घेतला होता. त्या पल्ली गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे, मात्र सात वर्षांपूर्वी कोहकापरी गावातील वीज तारांवर पावसाळ्यात मोठे झाड पडले. तेव्हापासून वीज पुरवठा खंडित झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा महावितरण कंपनीकडे तक्रार केली. मात्र गावात एकही वीज ग्राहक नसल्याने वीज पुरवठा सुरू करण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे मागील सात वर्षांपासून सदर गाव अंधाराचा सामना करीत आहे.ही बाब ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दीपक दळवी यांच्या लक्षात आली. त्यांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गावात ग्राहक असण्याची अट वीज कंपनीने टाकली. पोलिसांनी ग्रामसभा घेऊन गावकºयांना वीज जोडणी घेण्यास सांगितले. त्यानुसार गावातील नागरिकही तयार झाले. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला. आता वीज कंपनीने विजेचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. गावात नवीन खांब बसविले जात आहेत. त्याचबरोबर नवीन ट्रान्सफार्मरही लावले जाणार आहे. त्यामुळे लवकरच या गावातील रस्ते आणि घरेही विजेच्या प्रकाशाने उजाडणार आहे.केहकापरीला जाण्यासाठी रस्ता नाहीपोलिसांच्या मदतीने केहकापरी गावाचा वीज पुरवठा सात वर्षानंतर सुरू होणार आहे, मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटेचा आधार घेत गाव गाठावे लागते. घनदाट जंगलात असलेले सदर गाव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विकासासाठी आलेला निधी जातो कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.