शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बांधकामापासूनच संरक्षक कठड्यांच्या प्रतीक्षेत किन्हाळ्याचा पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:28 IST

देसाईगंज/माेहटाेला : किन्हाळा ते फरीदरम्यान गाढवी नदीवर अनेक वर्षांपासून पूल आहे. परंतु या पुलावर अद्यापही संरक्षक कठडे लावण्यात आले ...

देसाईगंज/माेहटाेला : किन्हाळा ते फरीदरम्यान गाढवी नदीवर अनेक वर्षांपासून पूल आहे. परंतु या पुलावर अद्यापही संरक्षक कठडे लावण्यात आले नाही. बांधकामापासूनच येथे संरक्षक कठडे नाहीत.सध्या या मार्गावरील रहदारी वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

किन्हाळालगतच्या पुलावर संरक्षक कठडे लावण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच केले जात आहे. नदी अथवा पुलाचे बांधकाम करताना अंदाजपत्रकात संरक्षक कठड्यासह अन्य खर्च नमूद असताे. परंतु ह्या बाबीकडे नागरिक गंभीरतेने लक्ष देत नाही. किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव ह्या गावांचा बैलबंडी व पादचारी मार्ग हा कोकडी गावावरुन गाढवी नदी पार करुन देसाईगंज या ठिकाणी यावे लागत असे. कोकडी या ठिकाणी पोहाेचण्यासाठी एक ओढा व नदी ओलांडून जावे लागत असे. त्यामुळे मार्गाची ही अडचण लक्षात घेता अंदाजे तीस वर्षांपूर्वीच्या तत्कालीन लाेकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने किन्हाळा व फरी यादरम्यान पुलाची निर्मिती झाली. या पुलामुळे कुरखेडापासून देसाईगंज हा कमी अंतराचा सरळ मार्ग तयार झाला. त्यामुळे येथून आता वर्दळ वाढली आहे. रहदारीच्या पुलावर संरक्षक कठडे लावण्याची सोय असतानाही आजतागायत ह्या ठिकाणी संरक्षक कठडे लावले नाही. काही वर्षांपूर्वी एकदा तर धानाचे पोते भरलेला ट्रॅक्टर नदीतच उलटला हाेता. कामाच्या अंदाज पञकात या संरक्षक कठडे, नदीचे नाव, पूल निर्मिती दिनांक व कामावर झालेला खर्च आदी लिहिणे आवश्यक असते. परंतु येथील पुलावर अशाप्रकारचा कुठलाही बाेर्ड दिसून येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुलावर कठडे लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.