शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यानंतर शिजणार ‘खिचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:25 IST

यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीसह इतर आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले.

ठळक मुद्देअखेर कंत्राट निश्चित : विद्यार्थ्यांना मिळणार पूरक पोषण आहार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीसह इतर आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले. त्यामुळे उशिरा का होईना, अखेर शाळांमध्ये आता खिचडी शिजणार आहे.शिक्षण संचालनालयाने प्रत्येक जिल्ह्यासाठी दिलेल्या कंत्राटात गडचिरोली जिल्ह्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन लि.मुंबई यांच्याशी ८ डिसेंबर रोजी करारनामा झाला आहे. त्यानुसार डिसेंबर २०१७ पासून शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाचे साहित्य पुरविले जाणार आहे. आतापर्यंत केवळ तांदळाचा पुरवठा शाळांना केला जात होता. इतर पोषण आहाराचे साहित्य मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर खरेदी करून पोषण आहार बनविण्यास सांगितले होते. पण काही दिवस मुख्याध्यापकांनी उधारीत किराणा साहित्य घेतल्यानंतर साहित्य देण्यास कोणी तयार नसल्यामुळे विद्यार्थ्यांची खिचडी शिजतच नव्हती. मुख्याध्यापकांनी उधारीत विकत घेतलेल्या साहित्यासाठी आता रक्कम मिळाली असून ती रक्कम पंचायत समित्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. आहारात दर शनिवारला अंडी, केळी, राजगिरा लाडू, बिस्कीट, गुळ-चणा, शेंगदाने यापैकी कोणताही एक पुरक आहार देणे गरजेचे आहे. मात्र त्याचा खर्च इंधन भाजीपाला खर्चातून करावयाचा आहे. त्यासाठी वेगळी तरतूद नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळविले.तूर डाळीऐवजी मसूर डाळजिल्हा परिषद प्रशासनाने सोमवार ते शनिवार या सहा दिवसांच्या पोषण आहारात दररोज काय राहणार हे ठरवून दिले आहे. मात्र त्यात तूर डाळ गायब केली असून त्याऐवजी मसूर डाळ दिली जाणार आहे. शासन निर्णयानुसार तूर डाळीचा पुरवठा महाराष्टÑ राज्य पणन महासंघाकडून करण्यात येणार आहे. परंतू पणन महासंघाने गडचिरोली मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या पत्राची अद्याप दखलच घेतली नाही. त्यामुळे आहारात खंड पडू नये म्हणून तूर ऐवजी मसूर डाळ वापरण्याचा निर्णय जि.प. प्रशासनाने १८ डिसेंबरला घेतला.असा असेल सहा दिवसांचा नियमित आहारसोमवारी मूग डाळ व तांदळाची खिचडी किंवा मूग डाळीचे वरण व तांदळाचा भात, मंगळवारी भात व वाटाण्याची भाजी किंवा तांदूळ भात व वाटाणा उसळ, बुधवारी मूसर डाळीचे वरण व भात किंवा मसूर डाळ व तांदळाची खिचडी, गुरूवारी मूग डाळ व तांदळाची खिचडी किंवा मूग डाळ वरण भात, शुक्रवारी मसूर डाळ व खिचडी किंवा मसूर डाळ व वरण भात तर शनिवारी वाटाणा मसाले भात किंवा वाटाण्याचा पुलाव कोबी, बटाटा, गाजर पुलाव असा आहाराचा तक्ता बनविण्यात आला आहे.