शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

कसारी गाव जिल्ह्यासाठी आदर्शवत

By admin | Updated: April 18, 2016 03:59 IST

शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे.

देसाईगंज : शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. ही बाब जिल्हा तसेच राज्यभरातील गावातील नागरिकांसाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज तालुक्यातील कसारी गावाने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन ‘ग्राम उदय से भारत उदय’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार क्रिष्णा गजबे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पालक सचिव विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती प्रीती शंभरकर, उपसभापती नितीन राऊत, उपमुख्य कार्यकारी आधिकारी शालिक धनकर, कार्यकारी अभियंता सोनोने, समाज कल्याण अधिकारी पेंदाम, बाबरे, पं. स. सदस्य परसराम टिकले, शांताबाई तितीरमारे, जि.प. सदस्य पल्लवी लाडे, सरपंच तिर्था पुसाम, तहसीलदार मडावी, गट विकास अधिकारी संगिता भांगरे, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, संचालन ग्राम विकास अधिकारी पी. एल. पेशने तर आभार संगीता भांगरे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी गावात फेरफटका मारून विकास कामांची माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)