शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

कठाणी लागला मार्गी; पर्लकोटाचा पूल कागदावरच

By admin | Updated: June 5, 2015 01:40 IST

भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे.

भामरागड : भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे. मात्र गडचिरोली लगतच्या कठाणी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले. राज्यपालांचा दत्तक असलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटाच्या पूल बांधकामाकडे शासनाकडे पुन्हा दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांमध्ये पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधीविषयी कमालीचा असंतोष वाढला आहे. २००६-०७ मध्ये महापुरानंतर भामरागडवासीयांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्वत: आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे ही उपस्थित होते. विलासराव देशमुख यांनी भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २०१० मध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आर. आर. पाटील यांनी स्वीकारली. अनेकदा त्यांनी भामरागडला भेटी दिल्या. पालकमंत्री असताना नागपूर येथे रवी भवनात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्लकोटा व कठाणी नदीचा पूल उंच करण्यासाठी काम सुरू करा, असे आदेश दिले होते. निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे आश्वासनही ना. पाटील यांनी दिले होते. मात्र गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीचा पूल उंच करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. या कामासाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका असूनही येथील नवीन पूल बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. हा अरूंद व ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा सरासरी दोन महिने संपर्क तुटून राहतो. अनेकदा मागणी करूनही या पुलाचे काम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सरकारप्रती कमालीचा असंतोष वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)भामरागड तालुका हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र आजवर शासनाचे व प्रशासनाचे भामगरागड तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने भामरागड तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नावर अनेकदा शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याच्या प्रश्नाबाबतही मागणी करण्यात आली. परंतु शासनाचे भामरागडच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. - रघुनाथ तलांडे, संस्थापक अध्यक्ष, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती