शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

कठाणी लागला मार्गी; पर्लकोटाचा पूल कागदावरच

By admin | Updated: June 5, 2015 01:40 IST

भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे.

भामरागड : भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे. मात्र गडचिरोली लगतच्या कठाणी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले. राज्यपालांचा दत्तक असलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटाच्या पूल बांधकामाकडे शासनाकडे पुन्हा दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांमध्ये पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधीविषयी कमालीचा असंतोष वाढला आहे. २००६-०७ मध्ये महापुरानंतर भामरागडवासीयांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्वत: आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे ही उपस्थित होते. विलासराव देशमुख यांनी भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २०१० मध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आर. आर. पाटील यांनी स्वीकारली. अनेकदा त्यांनी भामरागडला भेटी दिल्या. पालकमंत्री असताना नागपूर येथे रवी भवनात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्लकोटा व कठाणी नदीचा पूल उंच करण्यासाठी काम सुरू करा, असे आदेश दिले होते. निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे आश्वासनही ना. पाटील यांनी दिले होते. मात्र गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीचा पूल उंच करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. या कामासाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका असूनही येथील नवीन पूल बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. हा अरूंद व ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा सरासरी दोन महिने संपर्क तुटून राहतो. अनेकदा मागणी करूनही या पुलाचे काम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सरकारप्रती कमालीचा असंतोष वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)भामरागड तालुका हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र आजवर शासनाचे व प्रशासनाचे भामगरागड तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने भामरागड तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नावर अनेकदा शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याच्या प्रश्नाबाबतही मागणी करण्यात आली. परंतु शासनाचे भामरागडच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. - रघुनाथ तलांडे, संस्थापक अध्यक्ष, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती