शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काेराेना अद्याप गेला नाही; या पाच चुका केल्यास तिसरी लाट अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

गडचिराेली : लाॅकडाऊनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला थाेडीफार गती देण्यासाठी शासनाने १ जूनपासून काही प्रमाणात अनलाॅक केले आहे. दुकाने उघडी हाेताच ...

गडचिराेली : लाॅकडाऊनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला थाेडीफार गती देण्यासाठी शासनाने १ जूनपासून काही प्रमाणात अनलाॅक केले आहे. दुकाने उघडी हाेताच बाजारपेठेत पुन्हा गर्दी उसळत आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी ज्या चुका केल्या त्यामुळे दुसरी लाट आली. दुसरी लाट ओसरत चालली आहे. पुन्हा चुका केल्यास तिसरी लाट अटळ असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काेराेनाचे संकट लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात लाॅकडाऊन जाहीर केले आहे. तब्बल दीड महिना अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद हाेती. लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. दीड महिन्यानंतर दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, काेराेनाचे संकट पूर्णपणे गेले नाही. दीड महिना दुकाने व इतर व्यवहार ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेवर फार माेठा परिणाम झाला. अर्थव्यवस्थेला थाेडीफार गती देण्याच्या उद्देशाने १ जूनपासून शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दुकाने सुरू हाेताच पहिल्या लाटेत केलेल्या चुका पुन्हा दुसऱ्या लाटेत नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१ पहिल्या अनलाॅकनंतर बाजारपेठेत गर्दी उसळली हाेती.

२ अनेकांनी बाहेर पडताना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंद केला.

३ ग्रामीण व शहरी भागात कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली.

४ काेराेनाचा संसर्ग झाल्यानंतरही चाचणी करण्यास तयार नव्हते.

५ बाजारपेठेतून घरी गेल्यानंतर फारशी काळजी घेतली जात नव्हती.

बाॅक्स.....

नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची

१) काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येक नागरिकामध्ये जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार वागणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

२) दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी राहते. तरीही काही नागरिक अनावश्यक फिरत असल्याचे दिसून येते. काेराेनाचे संकट अजूनही गेले नाही, याची पक्की जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे.

३) काेराेनामुळे हाेणारे मृत्यू टाळण्यासाठी लस घेणे हा प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी प्रशासनामार्फत जागृती केली जात आहे. लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

४) काेराेनाचे नियम पाळण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दुकानामध्ये गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा पुन्हा दुकाने बंद करण्याची वेळ येईल.

५) शासकीय कार्यालयांमधील कर्मचारीही काेराेनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यांनीसुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे.

बाॅक्स ...

पहिला अनलाॅक दुसरा

४ ऑगस्ट २०२० दिनांक १ जून २०२१

६४४ एकूण काेराेना रुग्ण २९,३९६

१ एकूण मृत्यू ७१९