शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

जंगल बचाव, एफडीसीएम हटाव

By admin | Updated: April 28, 2016 01:01 IST

देसाईगंज उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील सात गावांमध्ये वन विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात...

शिवसेनेचे नेतृत्व : सात गावांतील हजारो नागरिक मोर्चात रस्त्यावरदेसाईगंज : देसाईगंज उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील सात गावांमध्ये वन विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वात सात ग्रामपंचायतीच्या गावातील हजारो नागरिक एकत्र येऊन बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान ‘एफडीसीएम चले जाओ’ असा नारा देत जंगल वाचविण्यासाठी रखरखत्या उन्हात नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, जि. प. सदस्य छाया कुंभारे, अशोक इंदुरकर यांनी केले. वन विकास महामंडळाकडून देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव, चिखली, चिखली रिठ, कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर, शिरपूर व आरमोरी तालुक्यातील वैरागड, पाथरगोटा परिसरात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना विश्वासात न घेता सर्रास ३० घन मीटरपेक्षा जास्त गोलाई असलेल्या लाकडाची तोड केली जात आहे. याविरोधात स्थानिक ग्रामपंचायती, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांनी प्रखर विरोध दर्शविला. मात्र एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांकरवी गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असताना एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच आमदार क्रिष्णा गजबे व इतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन वृक्षतोडीला विरोध करून ग्रामस्थांचे समर्थन केले. मात्र त्यानंतरही वृक्षतोड थांबली नाही. त्यामुळे संतप्त झालेले सात गावातील हजारो नागरिक मोर्चादरम्यान रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये शिवसेनेचे देसाईगंज तालुका प्रमुख नंदू चावला, ग्रामीण तालुका प्रमुख विजय बुल्ले, युवा सेनेचे प्रमुख प्रशांत किलनाके, शिवसेना शहर प्रमुख सचिन वानखेडे, रमेश गरमळे, नितीन शंभरकर, होमराज हाळगुळे, श्यामराव वालदे, अशोक ठाकरे, हिरामन गराटे, सूमन धोंगळे, मुखरू राऊत, काशिनाथ दोनाडकर, वैरागडच्या सरपंच गौरी सोमनानी, श्रीराम अहीरकर, वसुधा सावे, घनश्याम प्रधान, शरद दोनाडकर, काशिनाथ नारनवरे, विश्वनाथ उईके, बकाराम नारनवरे, ओमप्रकाश ठेंगरी, जगदीश परसवानी, अहीरकर, विठ्ठल धोटे आदीसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चकऱ्यांनी सात गावांच्या जंगल क्षेत्रातील वृक्षतोड तत्काळ बंद करा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही प्रशासनाला यावेळी दिला. (वार्ताहर)एसडीओंशी मोर्चेकऱ्यांची चर्चाशिवसेनेचे शिष्टमंडळ व नागरिकांनी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. एफडीसीएममार्फत या सात गावात होणारी वृक्षतोड तत्काळ थांबविण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. दरम्यान उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी लोकांच्या इतक्या तक्रारी असतानासुद्धा वन विकास महामंडळाकडून वृक्षतोड का थांबविण्यात येत नाही, यासंदर्भाची कारणे विचारून यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.