शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जंगल बचाव, एफडीसीएम हटाव

By admin | Updated: April 28, 2016 01:01 IST

देसाईगंज उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील सात गावांमध्ये वन विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात...

शिवसेनेचे नेतृत्व : सात गावांतील हजारो नागरिक मोर्चात रस्त्यावरदेसाईगंज : देसाईगंज उपविभागातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील सात गावांमध्ये वन विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वात सात ग्रामपंचायतीच्या गावातील हजारो नागरिक एकत्र येऊन बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान ‘एफडीसीएम चले जाओ’ असा नारा देत जंगल वाचविण्यासाठी रखरखत्या उन्हात नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, जि. प. सदस्य छाया कुंभारे, अशोक इंदुरकर यांनी केले. वन विकास महामंडळाकडून देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव, चिखली, चिखली रिठ, कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर, शिरपूर व आरमोरी तालुक्यातील वैरागड, पाथरगोटा परिसरात स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना विश्वासात न घेता सर्रास ३० घन मीटरपेक्षा जास्त गोलाई असलेल्या लाकडाची तोड केली जात आहे. याविरोधात स्थानिक ग्रामपंचायती, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांनी प्रखर विरोध दर्शविला. मात्र एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांकरवी गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असताना एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच आमदार क्रिष्णा गजबे व इतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन वृक्षतोडीला विरोध करून ग्रामस्थांचे समर्थन केले. मात्र त्यानंतरही वृक्षतोड थांबली नाही. त्यामुळे संतप्त झालेले सात गावातील हजारो नागरिक मोर्चादरम्यान रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये शिवसेनेचे देसाईगंज तालुका प्रमुख नंदू चावला, ग्रामीण तालुका प्रमुख विजय बुल्ले, युवा सेनेचे प्रमुख प्रशांत किलनाके, शिवसेना शहर प्रमुख सचिन वानखेडे, रमेश गरमळे, नितीन शंभरकर, होमराज हाळगुळे, श्यामराव वालदे, अशोक ठाकरे, हिरामन गराटे, सूमन धोंगळे, मुखरू राऊत, काशिनाथ दोनाडकर, वैरागडच्या सरपंच गौरी सोमनानी, श्रीराम अहीरकर, वसुधा सावे, घनश्याम प्रधान, शरद दोनाडकर, काशिनाथ नारनवरे, विश्वनाथ उईके, बकाराम नारनवरे, ओमप्रकाश ठेंगरी, जगदीश परसवानी, अहीरकर, विठ्ठल धोटे आदीसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चकऱ्यांनी सात गावांच्या जंगल क्षेत्रातील वृक्षतोड तत्काळ बंद करा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही प्रशासनाला यावेळी दिला. (वार्ताहर)एसडीओंशी मोर्चेकऱ्यांची चर्चाशिवसेनेचे शिष्टमंडळ व नागरिकांनी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. एफडीसीएममार्फत या सात गावात होणारी वृक्षतोड तत्काळ थांबविण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. दरम्यान उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी लोकांच्या इतक्या तक्रारी असतानासुद्धा वन विकास महामंडळाकडून वृक्षतोड का थांबविण्यात येत नाही, यासंदर्भाची कारणे विचारून यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.