शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सळाखी निघालेल्या जीर्ण रपट्यावरूनच करावा लागताे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

झिंगानूर परिसरात पक्के रस्ते, आरोग्य, वीज आदींसह अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. परिसरातील बारमाही वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर ...

झिंगानूर परिसरात पक्के रस्ते, आरोग्य, वीज आदींसह अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. परिसरातील बारमाही वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर पुलाची निर्मिती न झाल्याने दुर्गम भागातील नागरिक आजही पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात. झिंगानूर परिसरातील नैनगुंडा नाल्यावर या परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी ३० वर्षांपूर्वी रपटा बांधण्यात आला. मात्र, या रपट्याच्या देखभालीकडे सातत्याने कानाडोळा करण्यात आल्याने हा रपटाच नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रपट्यावरील सळाखी बाहेर आल्या आहेत. रपट्यावरून पाणी वाहत असताना या सळाखींचा अंदाज येत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रपट्याच्या दुरवस्थेमुळे यंदाच्या पावसाळ्यात सदर रपटा वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशी दुर्घटना घडल्यास परिसरातील ३० गावांतील नागरिकांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटू शकताे.

बॉक्स

रपट्यावर पडला मोठा खड्डा

नैनगुंडा नाल्यावरील रपट्याची उंची अत्यंत कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. त्यातच या रपट्यावर मोठा खड्डा पडला आहे. जरासा पाऊस आल्यानंतरही रपट्यावरून पाणी वाहते. त्यामुळे अनेकजण येथून प्रवास करतात. सध्या रपट्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यामुळे अनेकदा दुचाकी वाहनधारक खाली पडले आहेत. याशिवाय परिसरातील अन्य रस्तेही दुरवस्थेत आहेत; परंतु अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधीही या समस्येकडे कानाडाेळा करीत आहेत. ही समस्या लवकर मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.