शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सळाखी निघालेल्या जीर्ण रपट्यावरूनच करावा लागताे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

झिंगानूर परिसरात पक्के रस्ते, आरोग्य, वीज आदींसह अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. परिसरातील बारमाही वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर ...

झिंगानूर परिसरात पक्के रस्ते, आरोग्य, वीज आदींसह अनेक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. परिसरातील बारमाही वाहणाऱ्या नद्या व नाल्यांवर पुलाची निर्मिती न झाल्याने दुर्गम भागातील नागरिक आजही पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करतात. झिंगानूर परिसरातील नैनगुंडा नाल्यावर या परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी ३० वर्षांपूर्वी रपटा बांधण्यात आला. मात्र, या रपट्याच्या देखभालीकडे सातत्याने कानाडोळा करण्यात आल्याने हा रपटाच नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रपट्यावरील सळाखी बाहेर आल्या आहेत. रपट्यावरून पाणी वाहत असताना या सळाखींचा अंदाज येत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रपट्याच्या दुरवस्थेमुळे यंदाच्या पावसाळ्यात सदर रपटा वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशी दुर्घटना घडल्यास परिसरातील ३० गावांतील नागरिकांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटू शकताे.

बॉक्स

रपट्यावर पडला मोठा खड्डा

नैनगुंडा नाल्यावरील रपट्याची उंची अत्यंत कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. त्यातच या रपट्यावर मोठा खड्डा पडला आहे. जरासा पाऊस आल्यानंतरही रपट्यावरून पाणी वाहते. त्यामुळे अनेकजण येथून प्रवास करतात. सध्या रपट्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खड्ड्यामुळे अनेकदा दुचाकी वाहनधारक खाली पडले आहेत. याशिवाय परिसरातील अन्य रस्तेही दुरवस्थेत आहेत; परंतु अधिकाऱ्यांसह लाेकप्रतिनिधीही या समस्येकडे कानाडाेळा करीत आहेत. ही समस्या लवकर मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.