शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

जोगीसाखराचा बंधारा कुचकामी

By admin | Updated: July 30, 2015 01:16 IST

जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले.

मोटार पळविली : सेक्शन पाईप लिक झाल्याने बंधाऱ्याचे पाणी मोटारपर्यंत पोहोचले नाहीजोगीसाखरा : जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले. मात्र त्या बंधाऱ्यावरील मोटार चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच तत्कालीन अभियंत्यांच्या सदोष कार्यपध्दतीमुळे शासनाची कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना पूर्णत: फसली असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागाच्या वडसा यंत्रणेमार्फत सन १९९४-९५ मध्ये खासदार निधीतून जोगीसाखरा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीटचे कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. प्रत्येक बंधाऱ्याच्या माध्यमातून सभोवतालची २५ हेक्टर पेक्षा अधिक शेतजमीन बारमाही सिंचनाखाली आणून पाण्याची भूजल पातळी वाढविणे तसेच सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान जि.प. सिंचाईच्या वडसा उपविभागामार्फत बंधाऱ्यांच्या कामांमध्ये ५० फूट खोल विहीर खोदण्यात आली. त्यात इनवेल जॅकवेल त्यावर सात अश्वशक्तीच्या दोन मोटारी, पाणी पुरवठा टाकी, पाईपलाईन आदींचे काम करण्यात आले. मात्र सिंचाई विभागाच्या तत्कालीन अभियंत्याच्या सदोष कार्यप्रणालीमुळे इनवेल ते मोटारपर्यंत टाकण्यात आलेला सेक्शन पाईप लिक असल्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी मोटारपर्यंत कधीच पोहोचले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधाऱ्याचा एक थेंबही पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचला नाही. महिनाभरापूर्वी जोगीसाखरा येथील बंधाऱ्यातील जॅकवेलमध्ये सुरक्षित असलेल्या सात अश्वशक्तीच्या दोन मोटारी चोरीला गेल्या. (वार्ताहर)बंधाऱ्याचा शेतकऱ्याना कवडीचाही फायदा नाहीसततची नापिकी व दुष्काळामुळे जोगीसाखरा भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी, यासाठी जि.प.च्या लघु सिंचाई विभागामार्फत जोगीसाखरा येथील नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करण्यात आले. मात्र सदर बांधकाम योग्यरित्या करण्यात न आल्याने तसेच सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील एकाही शेतकऱ्याला कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेचा लाभ आजतागायत झाला नाही, हे विशेष.