शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि ...

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे : सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी येथे केला.सामाजिक परिवर्तन अभियानाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात काँग्रेसचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात काँग्रेसपासून दूर जाऊन विविध पक्षात विखुरला गेला. त्यांना परत काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यासाठी राज्यभर सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत १९ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून आता चौथा टप्पा सुरू झाल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.केंद्र व राज्य सरकारने २०१४ पासून मागासवर्गीयांच्या ३५६ योजना बंद केल्या आहेत. पण सत्तेला चिकटून बसलेले पक्ष त्यावर तोंडातू ब्र काढत नाहीत. समाजककल्याणच्या निधीमधून ३५०० कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी वळते केले. पण ना कर्जमाफी व्यवस्थितपणे दिली, ना मागासवर्गीयांना योजनांचा लाभ दिला. तरीही रामदास आठवले बोलत नसतील तर ते मागासवर्गियांच्या काय कामाचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.रुग्णांचे प्राण वाचविणाºया डॉक्टरांचेच प्राण घेण्याच्या गोष्टी करणारे हंसराज अहीर असो की कर्नाटकमध्ये जाती-धर्माच्या आधारेच माणसांची ओळख असावी, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री असो, या विधानांवरून भाजप सरकार मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सरकारी शाळा बंद करण्याचा घाटसरकारी शाळांमध्ये मागासवर्गिय, आर्थिक कमकुवत मुले शिकतात. पण त्याच शाळा बंद करण्याचा घाट रचून सरकार मागासवर्गियांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. सुटाबुटातल्या सरकारला याचे भान नाही. त्यामुळे मागासवर्गिय समाजाला भानावर आणण्यासाठी आम्ही हे समाजिक परिवर्तन अभियान राबवत असल्याचे डॉ.राजू वाघमारे म्हणाले.