शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि ...

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे : सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी येथे केला.सामाजिक परिवर्तन अभियानाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात काँग्रेसचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात काँग्रेसपासून दूर जाऊन विविध पक्षात विखुरला गेला. त्यांना परत काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यासाठी राज्यभर सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत १९ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून आता चौथा टप्पा सुरू झाल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.केंद्र व राज्य सरकारने २०१४ पासून मागासवर्गीयांच्या ३५६ योजना बंद केल्या आहेत. पण सत्तेला चिकटून बसलेले पक्ष त्यावर तोंडातू ब्र काढत नाहीत. समाजककल्याणच्या निधीमधून ३५०० कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी वळते केले. पण ना कर्जमाफी व्यवस्थितपणे दिली, ना मागासवर्गीयांना योजनांचा लाभ दिला. तरीही रामदास आठवले बोलत नसतील तर ते मागासवर्गियांच्या काय कामाचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.रुग्णांचे प्राण वाचविणाºया डॉक्टरांचेच प्राण घेण्याच्या गोष्टी करणारे हंसराज अहीर असो की कर्नाटकमध्ये जाती-धर्माच्या आधारेच माणसांची ओळख असावी, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री असो, या विधानांवरून भाजप सरकार मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सरकारी शाळा बंद करण्याचा घाटसरकारी शाळांमध्ये मागासवर्गिय, आर्थिक कमकुवत मुले शिकतात. पण त्याच शाळा बंद करण्याचा घाट रचून सरकार मागासवर्गियांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. सुटाबुटातल्या सरकारला याचे भान नाही. त्यामुळे मागासवर्गिय समाजाला भानावर आणण्यासाठी आम्ही हे समाजिक परिवर्तन अभियान राबवत असल्याचे डॉ.राजू वाघमारे म्हणाले.