शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि ...

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे : सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी येथे केला.सामाजिक परिवर्तन अभियानाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात काँग्रेसचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात काँग्रेसपासून दूर जाऊन विविध पक्षात विखुरला गेला. त्यांना परत काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यासाठी राज्यभर सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत १९ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून आता चौथा टप्पा सुरू झाल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.केंद्र व राज्य सरकारने २०१४ पासून मागासवर्गीयांच्या ३५६ योजना बंद केल्या आहेत. पण सत्तेला चिकटून बसलेले पक्ष त्यावर तोंडातू ब्र काढत नाहीत. समाजककल्याणच्या निधीमधून ३५०० कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी वळते केले. पण ना कर्जमाफी व्यवस्थितपणे दिली, ना मागासवर्गीयांना योजनांचा लाभ दिला. तरीही रामदास आठवले बोलत नसतील तर ते मागासवर्गियांच्या काय कामाचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.रुग्णांचे प्राण वाचविणाºया डॉक्टरांचेच प्राण घेण्याच्या गोष्टी करणारे हंसराज अहीर असो की कर्नाटकमध्ये जाती-धर्माच्या आधारेच माणसांची ओळख असावी, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री असो, या विधानांवरून भाजप सरकार मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सरकारी शाळा बंद करण्याचा घाटसरकारी शाळांमध्ये मागासवर्गिय, आर्थिक कमकुवत मुले शिकतात. पण त्याच शाळा बंद करण्याचा घाट रचून सरकार मागासवर्गियांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. सुटाबुटातल्या सरकारला याचे भान नाही. त्यामुळे मागासवर्गिय समाजाला भानावर आणण्यासाठी आम्ही हे समाजिक परिवर्तन अभियान राबवत असल्याचे डॉ.राजू वाघमारे म्हणाले.