शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

लोकसभेत काँग्रेसला बसलेला फटका भरून काढणे अशक्य

By admin | Updated: June 14, 2014 23:33 IST

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य भरून काढू शकत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागा लढविल्यास लोकसभेत बसलेल्या फटक्यातून सावरण्याची ताकद राकाँत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी झाले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. याचा फटका विदर्भात काँग्रेस-राकाँ आघाडीला बसला. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, अशी मागणी आपण राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शासनाने विधानसभेत घोषणा केल्यानंतरही आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. ते सुरू करण्यात यावे, व्यापारीच मालाची खरेदी करीत आहे, असे ते म्हणाले. मोदी लाटेमुळे निवडणुकीत देशभरात संपुआचा पराभव झाला असला तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात विविध कारणामुळे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही. काँगे्रसला या निवडणुकीत जबर फटका या मतदार संघात बसला. विधानसभेतही ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व आरमोरी हे तीनही विधानसभा मतदार संघ राकाँकडे द्यावेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही परिस्थिती सुधारू शकते, ऐवढी ताकद आमच्यामध्ये आहे, असा दावाही त्यांनी केला. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झालेत, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेले एटापल्ली पं.स.चे माजी उपसभापती घिसू मट्टामी, राकाँ नेते बापू तलांडी व ज्येष्ठ गांधीवादी उद्धवराव ताकसांडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, असा ठरावही पारित करण्यात आला, अशी माहिती धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, प्राचार्य खुशाल वाघरे, महिला राकाँ अध्यक्ष पुष्पा अलोणे, कार्यकारी अध्यक्ष जमीर हकीम, श्रीनिवास गोडसेलवार, अरूण हरडे, जयंत येलमुले आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)