शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत काँग्रेसला बसलेला फटका भरून काढणे अशक्य

By admin | Updated: June 14, 2014 23:33 IST

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य भरून काढू शकत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागा लढविल्यास लोकसभेत बसलेल्या फटक्यातून सावरण्याची ताकद राकाँत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी झाले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. याचा फटका विदर्भात काँग्रेस-राकाँ आघाडीला बसला. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, अशी मागणी आपण राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शासनाने विधानसभेत घोषणा केल्यानंतरही आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. ते सुरू करण्यात यावे, व्यापारीच मालाची खरेदी करीत आहे, असे ते म्हणाले. मोदी लाटेमुळे निवडणुकीत देशभरात संपुआचा पराभव झाला असला तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात विविध कारणामुळे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही. काँगे्रसला या निवडणुकीत जबर फटका या मतदार संघात बसला. विधानसभेतही ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व आरमोरी हे तीनही विधानसभा मतदार संघ राकाँकडे द्यावेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही परिस्थिती सुधारू शकते, ऐवढी ताकद आमच्यामध्ये आहे, असा दावाही त्यांनी केला. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झालेत, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेले एटापल्ली पं.स.चे माजी उपसभापती घिसू मट्टामी, राकाँ नेते बापू तलांडी व ज्येष्ठ गांधीवादी उद्धवराव ताकसांडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, असा ठरावही पारित करण्यात आला, अशी माहिती धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, प्राचार्य खुशाल वाघरे, महिला राकाँ अध्यक्ष पुष्पा अलोणे, कार्यकारी अध्यक्ष जमीर हकीम, श्रीनिवास गोडसेलवार, अरूण हरडे, जयंत येलमुले आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)