शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

संक्रांतीदरम्यान सकारात्मक संवाद करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:23 IST

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा.

ठळक मुद्देदातृत्वाची भावना जागृत करणारा सण

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा. संवाद हे जगातील सर्वात महत्त्वाचे चलन आहे. पैशाने व्यवहार होतो. मात्र संवादाने तो घडून येतो. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना व्यक्त होता येते, नाती जपण्याचे कौशल्य प्राप्त होते. भावनांना मोकळी वाट करून देता येत असल्याने मन स्वच्छ व निर्मळ राहण्यास मदत होते. संवादाने संवेदनशील मनांचे मिलन होते. महिलांमध्ये ऊर्जा, प्रेम, सहनशिलता, सृजनशिलता अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग विधायक कामांसाठी होऊ शकतो. स्त्रीमध्ये मातृत्व व दातृत्व राहते. वाणाच्या निमित्ताने दातृत्वाची भावना प्रकर्षाने जागृत होते. प्रत्येकाने प्रेमाने बोलले पाहिजे. समाजात क्रांती, बदल संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. प्रेम हे जगण्याचे तत्व आहे. प्रेमळ संवादाचा कुटुंब व समाजाला फायदा होतो. मनातील गैरसमज, राग, द्वेष आणि त्यातून उद्भवणारा वाद टाळायचा असेल तर संवाद गरजेचा आहे. संवादाने माणूस खुलतो, फुलतो आणि आनंदी होतो. यामुळे संपूर्ण जग आनंदी राहते, एवढी ताकद संवादामध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. संवादाच्या माध्यमातून विचारांचे संघटन होते. जिच्याकडे पण..‘ती’ म्हणून पाहिले जाते, संवादाच्या माध्यमातून ती काळोख दूर करणारी पणती निर्माण होऊ शकते.सविता सादमवारमुख्याध्यापिका, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट तथा जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष, संचालिका, पणती संस्था