शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बजाविली नोटीस

By admin | Updated: June 14, 2014 23:32 IST

शहराला लागून गोकुलनगरचा मुख्य तलाव आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन या तलावातील अतिक्रमीत कुटुंबानांना धोका निर्माण होऊ नये

सतर्कतेचा इशारा : तलावाच्या पात्रात अतिक्रमण केलेल्या २१ कुटंबाना गडचिरोली : शहराला लागून गोकुलनगरचा मुख्य तलाव आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन या तलावातील अतिक्रमीत कुटुंबानांना धोका निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. सतर्कतेचा इशारा देत पालिका प्रशासनाने तलावाच्या पात्रामध्ये अतिक्रमण केलेल्या २१ कुटुंबाना नोटीस बजाविली असून स्थलांतरीत होण्याचा तीन दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.ंजिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मे महिन्यात कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासंबंधी बैठक बोलाविली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला . बाराही तालुक्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण करण्याबाबत निर्देश दिले. पावसाळयात गोकुलनगरचा मुख्य तलाव पुर्णत: हाऊसफूल होतो. परिणामी सदर तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावातील पाणी नजिकच्या घरांमध्ये शिरते. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान होते. वेळ प्रसंगी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील नागरिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नगर पालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. याचाच एक भाग म्हणून तलावाच्या पात्रातील अतिक्रमणधारक २१ कुटुंबांना इतरत्र स्थलांतरीत होण्याबाबत नोटीस बजाविली आहे. तलावाच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून अनाधिकृतरित्या बांधकाम केले असल्याचेही पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसमध्ये नमुद केले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तलावाच्या पात्रातील घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवून या ठिकाणाहून इतरत्र स्थलांतरीत व्हावे, या निर्देशाचे नोटीस अतिक्रमीत कुटुंबाना देण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे प्रसंगी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन सतर्क व्हावे, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.यामुळे नुकसान झाल्यास न.प. प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचाही स्पष्ट खुलासाही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पाळीलगत असलेला बायपास मार्ग पूर्णत: बंद होतो. (स्थानिक प्रतिनिधी)