शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
12
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
13
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
14
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
15
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
16
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
17
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
18
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
19
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

नगर पंचायत निर्मितीने गावठाणाचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:38 IST

ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिल्याने ग्राम पंचायतमध्ये रखडलेला गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल, ....

आरमोरी : ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिल्याने ग्राम पंचायतमध्ये रखडलेला गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती जि. प. सदस्य अमोल मारकवार यांनी दिली आहे. मागील पाच वर्षांत आरमोरी शहराचा झपाट्याने विस्तार होणे सुरू आहे. शहराच्या सभोवताल नवीन वस्त्यांची निर्मिती होत आहे. मात्र नवीन वस्त्यांमधील जमिनी गावठाणमध्ये मोडत नसल्याने या जागेवर घर बांधलेल्या नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. शासनाने आरमोरीला नगर पंचायतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गावठाणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. आरमोरी शहरातील इंदिरानगर, बर्डी, डोंगरी, काळागोटा, शेगाव टोली, येथील नागरिकांनी घरे बांधले आहेत. मात्र त्यांना अजूनपर्यंत मालकी हक्क प्रदान करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना ग्राम पंचायतीच्या वतीने सवलती मिळण्यासही अडचण जात होत्या. नगर पंचायत स्थापन झाल्याने घरांचे मालकी हक्क मिळणार आहे. त्याचबरोबर खरेदी-विक्रीचे व्यवहारही सुलभ होण्यास मदत होणार आहे. या जागेवर कर्जही मिळणार आहे. त्याचबरोबर या भागातील वस्तींचा विकास करण्यासाठी नगर पंचायत विशेष निधी उपलब्ध करून देऊ शकणार आहे. नगर पंचायतीची स्थापना झाल्याने शासनाकडून मिळणाऱ्या निधीत वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक समस्या मार्गी लागण्याची अपेक्षा जि. प. सदस्य मारकवार यांनी व्यक्त केली आहे.