शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

धान उचल व भरडाईचा मुद्दा मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

मंत्रालयस्तरावर अधिकारी व मंत्र्यांमध्ये सदर मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ कार्यालय मुंबई व सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुध्दा धान खरेदी व भरडाईचा हा विषय चर्चिला गेला आहे. मंत्रालयस्तरावरून येत्या तीन दिवसात तांदळाची मागणी, धान भरडाई व उचल आदीबाबतचे सर्व निर्णय होणार असून धान खरेदीची प्रक्रिया पूर्ववत सुरळीत होणार असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसात तोडगा निघणार : निम्म्या केंद्रांवरील खरेदी अजूनही बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात धानाची खरेदी ८ लाख क्विंटलपेक्षा अधिक करण्यात आली आहे. मात्र धानाची मागणी होत नसल्याने उचल व भरडाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांची ओरड होत असल्याने धान उचल व भरडाईचा विषय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालयात पोहोचला आहे.मंत्रालयस्तरावर अधिकारी व मंत्र्यांमध्ये सदर मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ कार्यालय मुंबई व सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुध्दा धान खरेदी व भरडाईचा हा विषय चर्चिला गेला आहे.मंत्रालयस्तरावरून येत्या तीन दिवसात तांदळाची मागणी, धान भरडाई व उचल आदीबाबतचे सर्व निर्णय होणार असून धान खरेदीची प्रक्रिया पूर्ववत सुरळीत होणार असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.सध्या धान खरेदी खोळंबल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून याचा गैरफायदा काही व्यापारी घेत आहेत.असे आहेत प्रक्रियेतील टप्पेआदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आविका संस्थेच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत खरीप व रबी हंगामात धानाची खरेदी केली जाते. केंद्रस्तरावरील स्थानिक गोदामात धानाची साठवणूक केली जाते. त्यानंतर करारबध्द राईस मिलर्सना डिलिव्हरी ऑर्डर दिले जाते. त्यानंतर मिलर्सच्या वतीने केंद्रांवरून धानाची उचल करून भरडाई केली जाते. भरडाईनंतर एका क्विंटलमागे ६७ किलो तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला पाठविला जातो. त्यानंतर पुरवठा विभागाच्या वतीने सदर तांदूळ जिल्हा व जिल्ह्याबाहेर वितरणाचे नियोजन केले जाते. त्या-त्या पध्दतीने इतर जिल्ह्यांमध्ये तांदूळ वितरीत केला जातो.भारतीय अन्न महामंडळामार्फत जिल्हास्तरावर तांदळाची खरेदी केली जाते. ज्या जिल्ह्यात तांदळाची आवश्यकता आहे, त्या जिल्ह्याला तांदळाचा पुरवठा करण्याचे नियोजन महामंडळामार्फत केले जाते. तसेच डीसीपीएस प्रणालीद्वारे तांदळाची विल्हेवाट लावली जाते. तांदूळ खरेदी विक्रीबाबतचा करार शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसा आदेश मंत्रालयाकडून दोन ते तीन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी पूर्ववत सुरळीत होईल.- जे. पी. राजूरकर,प्रादेशिक व्यवस्थापक,आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीजिल्हा पुरवठा अधिकारी फोन उचलेनाधान भरडाईपासून तर धान खरेदीपर्यंतचा विषय पुरवठा विभागाशी निगडीत आहे. पण जिल्ह्यात निर्माण झालेल्या या गंभीर विषयाचे पुरवठा विभागाला काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत बदलून आलेले जिल्हा पुरवठा नरेंद्र भागडे यांना याबाबत विचारणा करण्यासाठी दोन वेळा त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला पण त्यांनी फोन उचलला नाही. यापूर्वीही याच विषयावर बोलण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गडचिरोलीत काम करताना आपल्या जबाबदाºया सांभाळण्यात स्वारस्य नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनस्तरावर तीन ते चार वेळा पत्रव्यवहारभरडाईनंतर तयार झालेल्या तांदळाची उचल होत नसल्याने महामंडळाची धान खरेदी प्रभावित झाली आहे. केंद्रस्तरावर धानाचे प्रमाण वाढले असून साठवणुकीसाठी जागा नाही. परिणामी शेतकºयांकडून ओरड होत आहे. तांदळाची विल्हेवाट लागत नसल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे. अशा आशयाचे पत्रव्यवहार जिल्हाधिकारी, आदिवासी विकास महामंडळाचे नाशिक येथील मुख्य कार्यालय यांच्याकडे जानेवारी महिन्यात तीन वेळा करण्यात आला आहे. त्यानंतर स्मरणपत्रही पाठविण्यात आले आहे. तांदळाचा प्रश्न मार्गी न लागल्याने कुरखेडा, धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील मिळून ४० वर केंद्रावर धानाची खरेदी बंद आहे.

टॅग्स :Marketबाजार