शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्ह्याचा मुद्दा विधानसभेत

By admin | Updated: June 14, 2014 02:13 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्मितीस राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.

गडचिरोली : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्मितीस राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न जोर धरू लागला असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडेही जिल्हा निर्मितीची मागणी रेटून धरली आहे.गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर-दक्षिण विस्तार जवळपास ३५० किमी आहे. भामरागड व सिरोंचा हे तालुके गडचिरोली मुख्यालयापासून सुमारे २५० किमी अंतरावर आहेत. जिल्हास्थळी एखाद्या प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकाला त्याच दिवशी परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. एक दिवस येण्यासाठी, दुसरा दिवस प्रशासकीय काम करण्यासाठी व तिसरा दिवस परत जाण्यासाठी लागत असल्याने नागरिकांना बराच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ तालुके असून अहेरी परिसरात ५ तालुके सध्या कार्यरत आहेत. अहेरी परिसराचा ९० टक्के भूभाग दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. तालुक्यांचा आकार मोठा असल्याने ७० ते ८० किमीचे अंतर तुडवून नागरिकांना तालुकास्थळी यावे लागते. त्यामुळे बहुतांश नागरिक तालुकास्थळी येतच नाही व शासकीय योजनांचा लाभही घेत नाही. परिणामी सदर नागरिकांचा आर्थिक विकास थांबला आहे. या बाबीचा विचार करून आणखी सहा तालुके निर्माण करण्यात यावे व अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी आहे. विस्तीर्ण भूभागाचा विचार करून पोलीस विभागाने अहेरी पोलीस जिल्ह्याची निर्मिती केली आहे. अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात अतिरिक्त पोलीस दर्जाचे अधिकारीही देण्यात आले आहे. त्याच धरतीवर अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांकडून आंदोलन छेडून अहेरी जिल्ह्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे शासनाचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. राज्य मंत्रीमंडळाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण केला आहे. त्यानंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या मागणीकडे लक्ष वेधले आहे. (नगर प्रतिनिधी)