शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

ईशांक बानबले जिल्ह्यात पहिला

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.९७ टक्के लागला आहे. ४१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.९७ टक्के लागला आहे. ४१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूलचा ईशांक यादवराव बानबले हा विद्यार्थी ९६.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. जिल्ह्यातून १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २ हजार १९८ विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यातून ८६.२७ टक्के मुले व ८९.७९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात कोरची या अतिदुर्गम तालुक्याचा सर्वाधिक ९२.४१ टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल धानोरा तालुक्याचा ८५.६३ टक्के लागला आहे.सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरीची खुशबू साठवणे हिने मिळविला. तिला ९५.८० टक्के गुण आहे. तर राजे धर्मराव हायस्कूल आष्टीची काजल दुर्गे ही जिल्ह्यातून तिसरी आली आहे. तिला ९५.६० टक्के गुण मिळाले आहे. गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा किशन परतानी हा ९५.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून चौथा आला आहे. तर नागेपल्लीच्या सेंट फ्रांसीस इंग्लिश मीडिअम शाळेची श्रावणी उत्तरवार ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पाचवी आली आहे. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला १७ हजार १२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार ५५४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ५ हजार ८४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार २३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार २९७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ३२५ शाळांमधून १७ हजार १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये ७ हजार ३९१ मुले व ७ हजार १६९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार ५५४ प्राविण्य श्रेणीत, ५ हजार ८४६ प्रथम श्रेणीत, ६ हजार २३० द्वितीय श्रेणीत, १ हजार २९७ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १० आश्रमशाळांचा निकालही १०० टक्के लागला आहे. यावर्षी ग्रामीण भागातूनही अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्याच्या वर गुण मिळाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)३६७ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण४जिल्हाभरातून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सर्वच विद्यालयांमधून एकूण ५७९ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी नामांकन दाखल केले. यापैकी ५७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २२७ मुले व १४० मुलींचा समावेश आहे. यांच्या निकालाची टक्केवारी ६३.९४ टक्के आहे. याशिवाय ९३ विद्यार्थ्यांनी खासगीरित्या परीक्षा दिली. यापैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ४९.४६ आहे. आयसोलेटेड ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.तालुकानिहाय निकालगडचिरोली ८६.३१अहेरी ९२.०५आरमोरी ८७.१३भामरागड ८७.६३चामोर्शी ८६.२४देसाईगंज ८६.२७धानोरा ८५.६३एटापल्ली ८८.३५कोरची ९२.४१कुरखेडा ८९.३८मुलचेरा ९०.६६सिरोंचा ८९.१४एकूण ८७.९७