शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

केवळ ६७ हजार हेक्टर शेतीला सिंचन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:17 IST

जिल्हाभरात २ लाख ५४ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २६.३७ टक्के एवढे आहे.

ठळक मुद्देविहिरींवर शासनाचा भर : अडीच लाख हेक्टरवर होते लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात २ लाख ५४ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २६.३७ टक्के एवढे आहे.गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासासाठी योग्य असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचीच लागवड केली जाते. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड होते. धान पिकाला अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सिंचन आवश्यक आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा असणे गरजेची आहे. मात्र फार कमी शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे. त्यातही तलाव, बोड्यांच्या माध्यमातून धानाला पाणी दिले जाते. या तलाव बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंतच तलाव व बोड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यानंतर पाणी आटत असल्याने दुसरे पीक घेणे शक्य होत नाही.गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे १४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १० लाख ९८ हजार हेक्टरवर जंगल आहे. तर २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.कारवाफा, तुलतुली यासारख्या मोठ्या सिंचन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र वनकायद्यात सदर प्रकल्प रखडल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यावर फार मोठी मर्यादा आली. आता तर मोठे सिंचन प्रकल्पाला मान्यता देणेच शासनाने बंद केले आहे.केवळ विहिरींच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.चिचडोह सारख्या बॅरेजची गरजगडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या आहेत. या नद्यांचे पाणी अडविल्यास सभोवतालच्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. ही बाब चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजने सिध्द करून दाखविले आहे. चिचडोह बॅरेजप्रमाणे प्रत्येक १५ ते २० किमी अंतरावर बंधारे बांधून त्यामध्ये पाणी अडवून ठेवल्यास उन्हाळ्यातही शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. चिचडोह बॅरेज सारखे अनेक बॅरेज एकट्या वैनगंगा नदीवर बांधल्यास हजारो हेक्टर शेतीला फायदा होऊ शकतो.वनकायद्याने सिंचन वाढीवर मर्यादागडचिरोली जिल्ह्यात कारवाफा, तुलतुली यासारखे मोठमोठे सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. शासनाने निधी मंजूर करून काही प्रमाणात बांधकामही झाले. मात्र तेवढ्यातच केंद्र शासनाने वनकायदा लागू केला. या सिंचन प्रकल्पामुळे जंगलाची तोड होणार असल्याने शासनाने सदर सिंचन प्रकल्पांची मान्यताच रद्द केली. मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच मोठे तलाव सुध्दा मंजूर केले जात नाही. केवळ अस्तित्वात असलेल्या तलावांची दुरूस्ती करण्यावरच भर दिला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई