शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

केवळ ६७ हजार हेक्टर शेतीला सिंचन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:17 IST

जिल्हाभरात २ लाख ५४ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २६.३७ टक्के एवढे आहे.

ठळक मुद्देविहिरींवर शासनाचा भर : अडीच लाख हेक्टरवर होते लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरात २ लाख ५४ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २६.३७ टक्के एवढे आहे.गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासासाठी योग्य असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक धान पिकाचीच लागवड केली जाते. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड होते. धान पिकाला अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सिंचन आवश्यक आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा असणे गरजेची आहे. मात्र फार कमी शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे. त्यातही तलाव, बोड्यांच्या माध्यमातून धानाला पाणी दिले जाते. या तलाव बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंतच तलाव व बोड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यानंतर पाणी आटत असल्याने दुसरे पीक घेणे शक्य होत नाही.गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे १४ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १० लाख ९८ हजार हेक्टरवर जंगल आहे. तर २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.कारवाफा, तुलतुली यासारख्या मोठ्या सिंचन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र वनकायद्यात सदर प्रकल्प रखडल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यावर फार मोठी मर्यादा आली. आता तर मोठे सिंचन प्रकल्पाला मान्यता देणेच शासनाने बंद केले आहे.केवळ विहिरींच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.चिचडोह सारख्या बॅरेजची गरजगडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्या आहेत. या नद्यांचे पाणी अडविल्यास सभोवतालच्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. ही बाब चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजने सिध्द करून दाखविले आहे. चिचडोह बॅरेजप्रमाणे प्रत्येक १५ ते २० किमी अंतरावर बंधारे बांधून त्यामध्ये पाणी अडवून ठेवल्यास उन्हाळ्यातही शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. चिचडोह बॅरेज सारखे अनेक बॅरेज एकट्या वैनगंगा नदीवर बांधल्यास हजारो हेक्टर शेतीला फायदा होऊ शकतो.वनकायद्याने सिंचन वाढीवर मर्यादागडचिरोली जिल्ह्यात कारवाफा, तुलतुली यासारखे मोठमोठे सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. शासनाने निधी मंजूर करून काही प्रमाणात बांधकामही झाले. मात्र तेवढ्यातच केंद्र शासनाने वनकायदा लागू केला. या सिंचन प्रकल्पामुळे जंगलाची तोड होणार असल्याने शासनाने सदर सिंचन प्रकल्पांची मान्यताच रद्द केली. मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच मोठे तलाव सुध्दा मंजूर केले जात नाही. केवळ अस्तित्वात असलेल्या तलावांची दुरूस्ती करण्यावरच भर दिला जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई