शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा

By admin | Updated: April 20, 2017 02:14 IST

तालुक्यातील पळसगाव परिसरात गाढवी नदीलगत असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे.

पळसगाव परिसर : शेकडो एकरातील उन्हाळी धान पीक संकटात आरमोरी : तालुक्यातील पळसगाव परिसरात गाढवी नदीलगत असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. जवळपास २०० एकर जमिनीवर उन्हाळी धानपीक आहे. सध्या धानपिकाला वेळोवेळी पाण्याची गरज आहे. परंतु मागील दहा दिवसांपासून परिसरात अनियमित वीज पुरवठा होत असल्याने धानपीक संकटात सापडले आहे. पळसगाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. कृषिपंपाच्या माध्यमातून पिकाला पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे या भागात मागील १० दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे धानपिकाला वेळेवर पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. या परिसरात दरवर्षी शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी दुबार पिकाची लागवड केली आहे. गाढवी नदीच्या पाण्यावर तसेच विहिरीवर कृषिपंप लावण्यात आले आहेत. परंतु विजेच्याअभावी शेतीला वेळेवर पाणी देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून वीज वितरण कंपनीने तत्काळ दखल घेऊन नियमित वीज पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम, सरपंच देवनाथ झलके, शेतकरी बाबुराव मने, दिगांबर चहांदे, अनिल वैद्य, श्रीराम सेलोकर, राजकुमार गरफडे, प्रकाश सेलोकर, श्यामराव सेलोकर, संतोष कांबळे, मच्छिंद्र मेश्राम, कार्तिक मातेरे, शालिक वैद्य, दोडकू बनकर, भाऊराव उरकुडे, मनोहर गेडाम, रमाकांत ढोंगे, युवराज धोडरे, भाग्यवान वैद्य, यादव सपाटे, मुखरू तितीरमारे, सदानंद नखाते, हिरालाल ढोरे, गणेश गरफडे, भेंडेश्वर अंबादे, देवा मेश्राम, विस्तारी लिंगायत, गोपी उरकुडे, प्रमोद मने व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) पाण्याअभावी पडल्या भेगा पळसगाव परिसरात गाढवी नदी परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धानपिकाच्या बांध्यांमध्ये पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. या कालावधीत धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज असताना विजेच्या लपंडावामुळे वेळेवर पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उन्हामुळे धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.