शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दहा दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा

By admin | Updated: April 20, 2017 02:14 IST

तालुक्यातील पळसगाव परिसरात गाढवी नदीलगत असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे.

पळसगाव परिसर : शेकडो एकरातील उन्हाळी धान पीक संकटात आरमोरी : तालुक्यातील पळसगाव परिसरात गाढवी नदीलगत असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. जवळपास २०० एकर जमिनीवर उन्हाळी धानपीक आहे. सध्या धानपिकाला वेळोवेळी पाण्याची गरज आहे. परंतु मागील दहा दिवसांपासून परिसरात अनियमित वीज पुरवठा होत असल्याने धानपीक संकटात सापडले आहे. पळसगाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी गाढवी नदीलगत उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. कृषिपंपाच्या माध्यमातून पिकाला पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे या भागात मागील १० दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे धानपिकाला वेळेवर पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. या परिसरात दरवर्षी शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी दुबार पिकाची लागवड केली आहे. गाढवी नदीच्या पाण्यावर तसेच विहिरीवर कृषिपंप लावण्यात आले आहेत. परंतु विजेच्याअभावी शेतीला वेळेवर पाणी देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून वीज वितरण कंपनीने तत्काळ दखल घेऊन नियमित वीज पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम, सरपंच देवनाथ झलके, शेतकरी बाबुराव मने, दिगांबर चहांदे, अनिल वैद्य, श्रीराम सेलोकर, राजकुमार गरफडे, प्रकाश सेलोकर, श्यामराव सेलोकर, संतोष कांबळे, मच्छिंद्र मेश्राम, कार्तिक मातेरे, शालिक वैद्य, दोडकू बनकर, भाऊराव उरकुडे, मनोहर गेडाम, रमाकांत ढोंगे, युवराज धोडरे, भाग्यवान वैद्य, यादव सपाटे, मुखरू तितीरमारे, सदानंद नखाते, हिरालाल ढोरे, गणेश गरफडे, भेंडेश्वर अंबादे, देवा मेश्राम, विस्तारी लिंगायत, गोपी उरकुडे, प्रमोद मने व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) पाण्याअभावी पडल्या भेगा पळसगाव परिसरात गाढवी नदी परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धानपिकाच्या बांध्यांमध्ये पाण्याअभावी भेगा पडल्या आहेत. या कालावधीत धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज असताना विजेच्या लपंडावामुळे वेळेवर पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उन्हामुळे धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.