शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

सिरोंचातील रेती तस्करीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 01:48 IST

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना सुमारे ६९ ट्रक पकडण्यात आले;

विजय वडेट्टीवार यांची तक्रार : पकडलेल्या वाहनांवर नाममात्र दंड आकारल्याचा आरोप गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करीत असताना सुमारे ६९ ट्रक पकडण्यात आले; मात्र त्यांच्यावर नाममात्र ७ लाख २ हजार रूपये दंड आकारून सदर वाहने सोडून देण्यात आली. यात कोट्यवधी रूपयांच्या रेतीची तस्करी केली जात आहे. याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे प्रधानसचिव यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंटा, नगरम, वडधम, अंकिसा, चिंतरेवला, मुपीगुड्डा या रेतीघाटांचा लिलाव ई-टेंडरींगद्वारे करण्यात आला. रेती तस्करांनी अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून रेतीघाटाचा लिलाव विकत घेतला आहे. या रेतीघाटांच्या लिलावांमुळे रेती तस्करांना रानच मोकळे झाले आहे. अहेरीचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तरित्या २१ फेब्रुवारी रोजी ११.३० वाजताच्या सुमारास गोदावरी नदी पात्रातील वाळूघाटावर धाड टाकली. या धाडीत ट्रक व जेसीबीसह ६९ वाहने आढळून आली. यातील २७ वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरल्याचे आढळून आले. फक्त वाळूने भरलेली ट्रक तहसील कार्यालयात जमा करून उर्वरित रिकामे ४२ ट्रक रेती घाटावरच ठेवण्यात आले. या गंभीर प्रकरणाची तातडीने कारवाई करणे आवश्यक असताना केवळ वाळूने भरलेल्या २७ ट्रकवर ७ लाख २ हजार रूपयांचा दंड ठोठावला व ती वाहने सोडून देण्यात आली. या वाहनांवर किमान पाच कोटींच्या वर दंड ठोकणे आवश्यक होते. मात्र अत्यंत कमी दंड ठोकल्याने शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोदावरी नदी पात्रातून एका दिवसात १५० ते २०० ट्रक रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सिरोंचाचे तहसीलदार व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली असता, रेती तस्कराच्या गुंडांनी नागरिकांना मारहाण केली आहे. प्रशासनाने नागरिकांवरच खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मद्दिकुंटा घाटावरही नागरिकांनी आंदोलन केले असता, गुंडांनी मारहाण केली. रेती कंत्राटदाराने आजपर्यंत अनेकवेळा वाळू लिलावाच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार वडेट्टीवार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)