शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

अवैध वृक्षतोड, शिकारीत वाढ

By admin | Updated: February 26, 2015 01:42 IST

वनाचे संवर्धन, वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीस्थळी राहून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत नसल्याने वैरागड, कढोली परिसरात ...

लोकमत विशेषगडचिरोली : वनाचे संवर्धन, वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीस्थळी राहून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत नसल्याने वैरागड, कढोली परिसरात अवैध वृक्षतोड व शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड व कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसरातील वनकर्मचारी जिल्हा व तालुका मुख्यालयातून ये-जा करतात. परिणामी कर्तव्याकडे या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही जातीने लक्ष घालून मुख्यालयी राहत नसल्याने त्यांचे नियंत्रण हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाही. त्यामुळे वन व वन्य प्राण्यांचे रक्षण होत नसल्याचे परिसरातील अवैध वृक्षतोड व वन्य प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीवरून दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच वैरागड येथील क्षेत्र सहाय्यक मुख्यालयी राहत असून या उपवन क्षेत्रातील चारही वनरक्षक मुख्यालयी न राहता, बाहेरून ये-जा करतात. देलनवाडी वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी हे स्वत:च मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे या वनपरिक्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे फावले आहे. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे भरदिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जाते. त्यानंतर रात्री जंगलातून बैलगाडी व इतर साधनांच्या सहाय्याने इमारती लाकूड तसेच इतर मौल्यवान लाकडाची अवैध वाहतूक केली जाते. सदर गोरखधंदा या परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याकडे उपवन क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या परिसरात मौल्यवान सागवान, येन, बिजा व इतर लाकडांचा समावेश आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे येथील जंगलाचे प्रमाण विरळ झाले आहे. अवैध वृक्षतोड होत असतानाही तस्करांवर कारवाई करण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे एकूणच परिस्थितीवरून दिसून येत आहे. शनिवार, रविववार या सुटीच्या दिवशी वनकर्मचारी सुटीवर असतात. त्यामुळे अनेकदा याची संधी साधून वनतस्करी केली जात आहे. बाहेर गावाहून अनेकजण पक्ष्यांची शिकार करण्यासाठी येत असून भरदिवसा येथे पक्ष्यांची शिकार करून ते गावागावात विकल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने अशा घटना वैरागड, कढोली परिसरात वारंवार घडत आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)