शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

अवैध वृक्षतोड, शिकारीत वाढ

By admin | Updated: February 26, 2015 01:42 IST

वनाचे संवर्धन, वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीस्थळी राहून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत नसल्याने वैरागड, कढोली परिसरात ...

लोकमत विशेषगडचिरोली : वनाचे संवर्धन, वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. मात्र जबाबदारीस्थळी राहून कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत नसल्याने वैरागड, कढोली परिसरात अवैध वृक्षतोड व शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड व कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसरातील वनकर्मचारी जिल्हा व तालुका मुख्यालयातून ये-जा करतात. परिणामी कर्तव्याकडे या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही जातीने लक्ष घालून मुख्यालयी राहत नसल्याने त्यांचे नियंत्रण हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नाही. त्यामुळे वन व वन्य प्राण्यांचे रक्षण होत नसल्याचे परिसरातील अवैध वृक्षतोड व वन्य प्राणी व पक्ष्यांच्या शिकारीवरून दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच वैरागड येथील क्षेत्र सहाय्यक मुख्यालयी राहत असून या उपवन क्षेत्रातील चारही वनरक्षक मुख्यालयी न राहता, बाहेरून ये-जा करतात. देलनवाडी वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी हे स्वत:च मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे या वनपरिक्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे फावले आहे. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे भरदिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जाते. त्यानंतर रात्री जंगलातून बैलगाडी व इतर साधनांच्या सहाय्याने इमारती लाकूड तसेच इतर मौल्यवान लाकडाची अवैध वाहतूक केली जाते. सदर गोरखधंदा या परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र याकडे उपवन क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. या परिसरात मौल्यवान सागवान, येन, बिजा व इतर लाकडांचा समावेश आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे येथील जंगलाचे प्रमाण विरळ झाले आहे. अवैध वृक्षतोड होत असतानाही तस्करांवर कारवाई करण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे एकूणच परिस्थितीवरून दिसून येत आहे. शनिवार, रविववार या सुटीच्या दिवशी वनकर्मचारी सुटीवर असतात. त्यामुळे अनेकदा याची संधी साधून वनतस्करी केली जात आहे. बाहेर गावाहून अनेकजण पक्ष्यांची शिकार करण्यासाठी येत असून भरदिवसा येथे पक्ष्यांची शिकार करून ते गावागावात विकल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने अशा घटना वैरागड, कढोली परिसरात वारंवार घडत आहेत. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)