शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांवर इंटरनेट कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:59 IST

रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार त्रस्त : इन्व्हॉईस क्रमांक मिळण्यास अडचण; वाहनांची लागते रांग

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे. परिणामी घाटावर ट्रॅक्टरची मोठी रांग लागत आहे.रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी शासनाने रेती वाहतूक व उपशाचे नियम अतिशय कडक केले आहेत. रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाकडे टीपी दिली जात होती. मात्र बºयाचवेळा एकाच टीपीवर अनेक ट्रॅक्टर रेती नेली जात होती. याला आळा घालण्यासाठी शासनाने टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकणे आवश्यक केले आहे. यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. इन्व्हॉईस नंबर मिळविण्यासाठी एन्ट्री करताना वाहन क्रमांक, वाहन चालविणाºया चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, रेती जेथे विकली जाणार आहे, त्या ठिकाणाचे व खरेदीदाराचे नाव, रेती निर्गमित केल्याचा दिनांक व वेळ, पावती वैधता दिनांक व वेळ टाकावा लागतो. यासाठी संबंधित रेतीघाट मालकाला सॉफ्टवेअर व लॉग ईन आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे. मात्र इंटरनेटची समस्या रेतीघाटांवर गंभीर आहे.गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेतीघाट सुद्धा अधिक आहे. मात्र येथील बहुतांश रेतीघाट जंगलव्याप्त भागात आहेत. जंगल भागात कव्हरेजची समस्या अतिशय गंभीर आहे. जंगलामुळे कव्हरेज राहत नाही. परिणामी आॅनलाईन एन्ट्री करताना उशीर होतो. एक एन्ट्री करण्यासाठी २० मिनीटे तर अर्धा तासाचा कालावधी लागते. तोपर्यंत ट्रॅक्टर रेतीने भरली जाते. मात्र इन्व्हॉईस नंबर मिळत नाही. प्रत्येक ट्रिपच्या वेळी चालकाकडे इन्व्हॉईस नंबर असलेली टीपी असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रेती अवैध माणून महसूल विभाग जवळपास सव्वा लाख रूपयांचा दंड ठोठावतो. त्यामुळे टीपीशिवाय वाहन पुढे नेण्याची हिंमत वाहनचालक करीत नाही. इन्व्हॉईस नंबर मिळविण्यासाठी उशीर होत असल्याने रेतीघाटांवर ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येत आहे.इन्व्हॉईस नंबरमुळे रेती तस्करीवर फार मोठा आळा बसण्यास मदत झाली असली तरी इन्व्हॉईस नंबर मिळत नसल्याने रेती कंत्राटदार सुद्धा त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच रेती उपसण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यातही सायंकाळी ६ वाजताच्या पूर्वी ट्रॅक्टर रिकामी होणे बंधनकारक करण्यात आले आहे. कधीकधी ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास ट्रॅक्टर रिकामी करण्यास उशिर होतो. अशाही ट्रॅक्टरवर दंड आकारला जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टरमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाळू घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरेप्रत्येक वाळू घाटाच्या ठिकाणी रेतीघाट मालकाला स्वत:च्या खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा लागणार आहे. ज्या ठिकाणी वाळू भरली जाते, त्या ठिकाणी एक कॅमेरा व सर्व वाहने ज्या ठिकाणावरून ये-जा करतात अशा ठिकाणी एक कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी रेतीघाटांना भेट देऊन अधूनमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.