शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

रेती घाटांवर इंटरनेट कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:59 IST

रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार त्रस्त : इन्व्हॉईस क्रमांक मिळण्यास अडचण; वाहनांची लागते रांग

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे. परिणामी घाटावर ट्रॅक्टरची मोठी रांग लागत आहे.रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी शासनाने रेती वाहतूक व उपशाचे नियम अतिशय कडक केले आहेत. रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाकडे टीपी दिली जात होती. मात्र बºयाचवेळा एकाच टीपीवर अनेक ट्रॅक्टर रेती नेली जात होती. याला आळा घालण्यासाठी शासनाने टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकणे आवश्यक केले आहे. यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. इन्व्हॉईस नंबर मिळविण्यासाठी एन्ट्री करताना वाहन क्रमांक, वाहन चालविणाºया चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, रेती जेथे विकली जाणार आहे, त्या ठिकाणाचे व खरेदीदाराचे नाव, रेती निर्गमित केल्याचा दिनांक व वेळ, पावती वैधता दिनांक व वेळ टाकावा लागतो. यासाठी संबंधित रेतीघाट मालकाला सॉफ्टवेअर व लॉग ईन आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे. मात्र इंटरनेटची समस्या रेतीघाटांवर गंभीर आहे.गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेतीघाट सुद्धा अधिक आहे. मात्र येथील बहुतांश रेतीघाट जंगलव्याप्त भागात आहेत. जंगल भागात कव्हरेजची समस्या अतिशय गंभीर आहे. जंगलामुळे कव्हरेज राहत नाही. परिणामी आॅनलाईन एन्ट्री करताना उशीर होतो. एक एन्ट्री करण्यासाठी २० मिनीटे तर अर्धा तासाचा कालावधी लागते. तोपर्यंत ट्रॅक्टर रेतीने भरली जाते. मात्र इन्व्हॉईस नंबर मिळत नाही. प्रत्येक ट्रिपच्या वेळी चालकाकडे इन्व्हॉईस नंबर असलेली टीपी असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रेती अवैध माणून महसूल विभाग जवळपास सव्वा लाख रूपयांचा दंड ठोठावतो. त्यामुळे टीपीशिवाय वाहन पुढे नेण्याची हिंमत वाहनचालक करीत नाही. इन्व्हॉईस नंबर मिळविण्यासाठी उशीर होत असल्याने रेतीघाटांवर ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येत आहे.इन्व्हॉईस नंबरमुळे रेती तस्करीवर फार मोठा आळा बसण्यास मदत झाली असली तरी इन्व्हॉईस नंबर मिळत नसल्याने रेती कंत्राटदार सुद्धा त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच रेती उपसण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यातही सायंकाळी ६ वाजताच्या पूर्वी ट्रॅक्टर रिकामी होणे बंधनकारक करण्यात आले आहे. कधीकधी ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास ट्रॅक्टर रिकामी करण्यास उशिर होतो. अशाही ट्रॅक्टरवर दंड आकारला जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टरमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाळू घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरेप्रत्येक वाळू घाटाच्या ठिकाणी रेतीघाट मालकाला स्वत:च्या खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा लागणार आहे. ज्या ठिकाणी वाळू भरली जाते, त्या ठिकाणी एक कॅमेरा व सर्व वाहने ज्या ठिकाणावरून ये-जा करतात अशा ठिकाणी एक कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी रेतीघाटांना भेट देऊन अधूनमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.