शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

भेंडाळा परिसरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : वाहनधारक त्रस्त; पावसाळ्यात आवागमनास होणार अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नवीन रस्त्यांचीही वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांची डागडुजी यावर्षीच्या उन्हाळ्यात करणे अपेक्षित होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या भेंडाळा परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते. भेंडाळा परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. तेलतून तुकूम ते एकोडी मार्ग तसेच वेलतूर तुकूम ते कळमगाव, सगनापूर ते नवेगाव माल, कान्होली ते मुरखळा, भेंडाळा ते रामाळा, दोटकुली बसस्टॉप ते वाघोली, भेंडाळा ते वेलतुर तुकूम, फोकुर्डी ते नवेगाव माल या सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर डांबर टाकल्यानंतर चाळण होईपर्यंत लक्ष दिले जात नाही. रस्त्यांबाबत लोकांच्या जेव्हा तक्रारी येतात तेव्हाच प्रशासनाला जाग येते. या परिसरातील काही रस्त्यांवर तर अद्याप एकदाही डांबर पडलेले नाही. असे रस्ते सुध्दा या परिसरात बघायला मिळतात. अशी गंभीर परिस्थिती ग्रामीण भागातील रस्त्यांची आहे. या भागांतील अगदी थोडेच रस्ते चांगले आहेत पण ते देखील दरवर्षीच्या पावसाळ्यात उखडून जाण्याची भीती असते. या गावांतील अंतर्गत रस्तेदेखील मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यांचे नव्याने खडीकरण करावे, अशी मागणी भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.अरूंद रस्त्यांच्या कडा भरण्याची मागणीभेंडाळा परिसरातील ग्रामीण भागात जाणारे रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांच्याही कडा खोलगट आहेत. मात्र कडांवर मुरूम टाकण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मार्र्कंडाकडे जाणाऱ्या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यांच्या कडा भरणे आवश्यक आहे. आधीच अरूंद असलेले रस्ते वाहतुकीस अडसर ठरत असतानाच कडा खोलगट झाल्याने अपघाताचा धोका आहे.परिसरातील रस्त्यांच्या वळणावर दुतर्फा झुडपे वाढली असल्याने विरूद्ध दिशेने येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली विशेषत: वळणावरील झुडपे तोडणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून झुडपे तोडावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा