शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अंतर्गत शिथिलता हवी पण जीवाची सुरक्षाही महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात करण्यात आलेले लॉकडाऊन पुन्हा ३० एप्रिलपर्यंत ...

ठळक मुद्देलॉकडाऊनवर मान्यवरांच्या प्रतिक्रिया । गैरसोय दूर करण्याचे नियोजन व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात करण्यात आलेले लॉकडाऊन पुन्हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले. मात्र आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्यामुळे या जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन अंतर्गत व्यवहारात सुरू करावेत, अशी भावना विविध व्यावसायिकांनी व्यक्त केली. मात्र जीव वाचेल तर सर्वकाही पुन्हा मिळवता येईल, असे म्हणत काही नेतेमंडळींनी सरकारी आदेशाचे पालन करणेच योग्य राहील, असे मत मांडले. अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे हाल होत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काही प्रमाणात अंतर्गत व्यवहार सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास आर्थिक झळ कमी प्रमाणात बसेल, असे मत काहींनी मांडले.कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे त्याचे निवारण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे. हे संकट टाळण्यासाठी थोडे नुकसान सर्वांनाच सहन करावे लागेल. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने थोडी सूट देण्यास हरकत नाही.- अशोक नेते, खासदारगडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसले तरी लगतच्या छत्तीसगड, तेलंगणात आहेत. त्यामुळे अंतर्गत व्यवहार सुरू केले तरी सीमापलिकडील व्यवहार रोखणे सोपे नाही. त्यामुळे सर्व व्यवहार सुरू करण्याची रिस्क घेणे योग्य वाटत नाही.- धर्मरावबाबा आत्रामआमदार, अहेरीसर्व व्यावसायिकांना दिवस वाटून द्याकेवळ किराणा दुकाने एवढीच माणसांची गरज नाही. संसारासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना आठवड्यातून एक-एक दिवस दिला तरी नागरिकांची कामे अडणार नाही आणि विविध व्यावसायिकांची झळ काही प्रमाणात कमी होईल.- हरिष कडूकर, अध्यक्ष, नाभिक संघटना गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाने आधीपासून चांगली भूमिका घेतल्याने कोरोनाची बाधा झाली नाही. बाहेरून येणारे आता थांबल्यामुळे नवीन रुग्ण येण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत व्यवहार सुरू ठेवणे गरजेचे आहे. व्यवहार ठप्प झाल्याने गोरगरिबांना जगणे कठीण झाले आहे. योग्य खबरदारी घेऊन व्यवहार सुरू करावे.- जेसा मोटवानी,व्यापारी संघटना, देसाईंगंजजिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळला नाही ही बाब निश्चितच चांगली आहे. पण आतापर्यंत कोणाला बाधा झाली नाही म्हणून पुढेही होणार नाही, असे नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. तरीही नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे नियोजन व्हावे.- अजय कंकडालवारअध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते