शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

१,८४२ शेतकऱ्यांना विमा मंजूर

By admin | Updated: June 3, 2016 01:13 IST

२०१५-१६ या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाली...

२०१५-१६ मधील मदत : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रक्कम प्राप्तगडचिरोली : २०१५-१६ या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाली असून सदर रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. जिल्हाभरातील १ हजार ८४२ विमा सभासद असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.अतिवृष्टी, दुष्काळ, आग, रोग आदींसारख्या दुर्घटनांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत सापडतोे. कधीकधी दुष्काळामुळे उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला थोडीफार आर्थिक मदत मिळावी, यासाठी पिकांचा विमा काढला जातो. शेतकरीवर्गाला नाममात्र रक्कम जमा करावी लागते. २०१५-१६ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधून २ हजार ८७२ शेतकऱ्यांनी ३ हजार ७३४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. विमा कंपनीकडे १६ लाख २० हजार ३८२ रूपये विमा हप्ता म्हणून जमा केला होता. सुमारे ५ कोटी ७५ लाख ४३ हजार ३८५ रूपयांचा विमा काढला होता. मागील वर्षी जिल्हाभर दुष्काळाचे सावट होते. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची रोवणीच केली नाही. त्यामुळे शेती मशागतीचा खर्च वाया गेला. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली, त्यांचेही धानपीक करपून गेले होते. त्यामुळे पीक विम्याची रक्कम मिळणार, अशी आशा शेतकरीवर्ग बाळगून होता. अधिकारीवर्गाकडून संपूर्ण शेतीचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर सात तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लागू केला आहे. १ हजार ८४२ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी विमा कंपनीकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला १ कोटी १६ लाख ७८ हजार ९३२ रूपये एवढी विमा रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्या-त्या शाखेमधून जमा केली जाणार आहे. खरीप हंगामाच्या मशागतीपूर्वी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाल्याने खरीप हंगामाचा थोडाफार खर्च उचलण्यास मदत झाली आहे. दुष्काळ परिस्थितीत विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. (नगर प्रतिनिधी)पीक विमा सक्तीचा होणारयापूर्वी पीक विमा काढणे शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीक विमा काढण्यास तयार होत नव्हते. जे शेतकरी बँकांकडून कर्ज घेत होते, ते शेतकरी पीक विमा काढत होते. इतर शेतकरी मात्र पीक विमा काढण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नेहमीच कमी राहत होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागील वर्षी केवळ २ हजार ८७२ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गडचिरोली जिल्ह्यात एकूण जवळपास ५० हजार शेतकरी आहेत. त्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. खरीप हंगामासाठी लाभदायकपीक विम्याची रक्कम अगदी खरीप हंगामाच्या सुरुवातीला प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीचे कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर खते, बी-बियाणे खरेदीचीही लगबग सुरू केली आहे. पैशाची नित्तांतन गरज शेतकरीवर्गाला होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झाला आहे. या माध्यमातून खरीप हंगामाचा थोडाफार खर्च पीक विम्याच्या रकमेतून करण्यास मदत होणार आहे.