शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शिष्यवृत्तीत ५० टक्के कपात केल्याने ओबीसींवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारने केंद्र शासनाचे कुठलेही आदेश नसताना भारत सरकार शिष्यवृत्तीमध्ये ५० टक्के कपात करून ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच १०० टक्के शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी राष्टÑीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी केली आहे.या संदर्भात राष्टÑीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन ...

ठळक मुद्देशिष्यवृत्ती द्या : राष्टÑीय ओबीसी महासंघ आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारने केंद्र शासनाचे कुठलेही आदेश नसताना भारत सरकार शिष्यवृत्तीमध्ये ५० टक्के कपात करून ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच १०० टक्के शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी राष्टÑीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी केली आहे.या संदर्भात राष्टÑीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर केले. यावेळी ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचीत वांढरे, राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर, दादाजी चुधरी, बादल गडपायले, सुधांशू भुजाडे, विनय खेवले, परमानंद पुनमवार, वैभव केळझरकर, श्रीकांत मुनघाटे, आर. पी. लांजेवार आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २९ मे २००३ च्या शासन निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, राज्याच्या ओबीसी, विजाभज आणि विमाप्र मंत्रालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या २१ आॅगस्ट २०१७ चा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा, ओबीसीसह सर्व विद्यार्थ्यांसाठी असलेली शैक्षणिक कर्ज पुरवठा योजना निधीअभावी शासनाने बंद केली आहे. त्यामुळे ओबीसीसह सर्वच समाजातील विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तत्काळ शैक्षणिक कर्ज पुरवठा योजना सुरू करावी, अशी मागणीही राष्टÑीय ओबीसी महासंघाने केली आहे. २९ मे २००३ च्या शासन निर्णयानुसार विजाभज व इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांशी ओबीसींच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

६५० अभ्यासक्रम शिष्यवृत्ती योजनेतून बादगतवर्षीपर्यंत एमबीए सारख्या अभ्यासक्रमाला भारत सरकारची शिष्यवृत्ती सुरू होती. मात्र राज्य सरकारने २१ आॅगस्ट २०१७ च्या जीआरनुसार ६५० अभ्यासक्रमांना भारत सरकारची शिष्यवृत्ती नाकारली आहे. त्यामुळे ओबीसी विजाभज व विमाप्र विद्यार्थी या ६५० अभ्यासक्रमांच्या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. सदर शासन निर्णय शासनाने तत्काळ रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्टÑीय ओबीसी महासंघाने दिला आहे.