शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

माहिती अधिकाराला ठेंगा

By admin | Updated: May 27, 2014 00:50 IST

माहितीचा अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी अभिलेख योग्य रितीने सुचीबद्ध करून त्यांची निर्देश सुची तयार करायचे होते.

गडचिरोली : माहितीचा अधिकार अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी अभिलेख योग्य रितीने सुचीबद्ध करून त्यांची निर्देश सुची तयार करायचे होते. मात्र बहुतांश कार्यालयांनी अजूनपर्यंत सर्व अभिलेख योग्य रितीने सुचीबद्ध केले नाही. एवढेच नाही तर काही कार्यालयांसमोर सहाय्यक जनमाहिती अधिकारी व जनमाहिती अधिकारी यांच्या नावाचा फलक सुद्धा लावण्यात आलेला नाही. भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबरच जनतेच्या उपयोगाची माहिती जनतेला प्राप्त व्हावी, यासाठी राज्य शासनाने १२ आॅक्टोबर २००५ पासून माहितीचा अधिकार अधिनियम अंमलात आणला. या अधिनियमातील कलम ४ (१) (क) मधील तरतुदीप्रमाणे सार्वजनिक प्राधिकरणांनी सर्व दस्तावेज योग्य रितीने सुचीबद्ध करून त्याची निर्देश सुची तयार करावी, संगणकीकरण करावे व आवश्यक सोयी-सुविधेनुसार दस्तावेजांचे संगणकीकरण करून सदर माहिती कार्यालयाची वेबसाईट तयार करून वेबसाईटवर टाकणे आवश्यक होते. या सर्व बाबी अधिनियम अंमलात आणल्यापासून चार महिन्याच्या आत पूर्ण करायच्या होत्या. मात्र माहितीचा अधिकार अधिनियम अंमलात येऊन ९ वर्षाचा कालावधी लोटूनही अनेक कार्यालयातील अभिलेख योग्यरितीने सुचीबद्ध करण्यात आले नसल्याचे दिसून येते. माहितीच्या अधिकारांतर्गत मागीतलेली माहिती देण्याची जबाबदारी कार्यालयातील नेमक्या कोणत्या अधिकार्‍याची आहे, हे सर्वसामान्य नागरिकांना कळावे, यासाठी प्रत्येक कार्यालयाने सहाय्यक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी व अपीलिय अधिकारी नेमायचे होते. त्यांच्या नावासह फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र बर्‍याचशा कार्यालयांनी या तिनही अधिकार्‍यांची नेमणूक केली नाही. काही कार्यालयांनी दर्शनी फलकसुद्धा लावला नसल्याचे दिसून येते. ९ वर्षाचा कालावधी लोटूनही माहितीचा अधिकार अधिनियमात दर्शविलेल्या बाबी शासकीय कार्यालयांनी पूर्ण केल्या नसल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर ९ मे रोजी शासन निर्णय काढून या सर्व बाबींची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश सर्व कार्यालयीन प्रमुखांना दिले आहेत. केलेल्या कार्यवाहीचा आढावा सर्व प्रशासकीय विभागांना सादर करावा लागणार आहे. माहितीच्या अधिकार अधिनियमानुसार अनेक कार्यालयांनी स्वत:च्या कार्यालयाच्या स्वतंत्र वेबसाईट तयार केल्या असल्या तरी या वेबसाईट अपडेट करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. वेबसाईट अपडेट न केल्यामुळे बदलून गेलेले अधिकार्‍यांची नावे त्यांचे दूरध्वनी क्रमांक दिसून येतात. त्याचबरोबर जुन्याच योजनांची माहितीही या वेबसाईटवर दिसून येते. एखाद्या नागरिकाने कार्यालयाच्या वेबसाईटवर विश्वास ठेवल्यास त्याची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कार्यालयांनी स्वतंत्र सहाय्यक जनमाहिती अधिकारी नेमले आहेत. मात्र वेबसाईट अपडेट केली जात नसल्याने सदर जनमाहिती अधिकारी नेमके कोणते काम करतात, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या कार्यालयांच्या वेबसाईट अपडेट नाही किंवा ज्या कार्यालयासमोर माहितीच्या अधिकाराचा फलक लावण्यात आला नाही, अशा कार्यालय प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा होत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत हजारो नागरिक माहिती मागतात. माहितीच्या अधिकारातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. कार्यालयामध्ये सुरू असलेला अनागोंधी कारभार लक्षात येऊ नये यासाठी वेबसाईट अपडेट केली जात नसल्याची माहिती समोर येत आहे. माहितीच्या अधिकार अधिनियमाला तुडविणार्‍यांना चपराक बसावी यासाठी ९ मे रोजी शासन निर्णय घेऊन तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असले तरी जे काम ९ वर्षापासून होऊ शकले नाही ते काम एका महिन्यात होणार काय, याविषयीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शासन निर्णय पायदळी तुडविणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)