शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांच्या प्रभावाने २५० शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:53 IST

तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामणी व चेरपल्ली या गावातील पशुपालकांच्या अडीचशेपेक्षा जास्त बकऱ्या मागील आठ दिवसांत अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत.

ठळक मुद्देपशुपालक धास्तावले : बामणी व चेरपल्लीत तेलंगणातील शेतकºयांनी केली होती फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामणी व चेरपल्ली या गावातील पशुपालकांच्या अडीचशेपेक्षा जास्त बकऱ्या मागील आठ दिवसांत अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत. कापसावर व इतर पिकांवर होत असलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या असल्याची माहिती गावकºयांनी दिली आहे.तेलंगणा राज्यातील काही नागरिकांनी बामणी व चेरपल्ली येथील शेतकऱ्यांची ५०० एकरपेक्षा अधिक जमीन भाड्याने घेतली आहे. या जमिनीवर त्यांनी कापूस व इतर पिकांची लागवड केली आहे. रोगांच्या प्रादुर्भावापासून पिकाला वाचविण्यासाठी तेलंगणातील शेतकरी अत्यंत जहाल कीटकनाशके फवारत आहेत. त्या शेताजवळच्या झाडांचा पाला खाल्यांमुळे बामणी व चेरपल्ली येथील पशुपालकांच्या ३०० हून अधिक बकऱ्या मागील आठ दिवसांत मृत्यूमुखी पडल्या आहेत.बामणी येथील दुर्गय्या गोसाई कुमरम यांच्या सुमारे १५० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. याच गावातील आमरय्या कुमरम यांच्या २० बकऱ्या, मनोहर झाडे यांच्या १६ बकºया, नंदू सिडाम यांच्या १० बकºया, कुमरय्या चौधरी यांच्या २६ बकºया, साईनाथ सिडाम यांच्या सात बकऱ्या, वासुदेव आत्राम यांच्या मालकीच्या १० बकऱ्या, लक्ष्मण पेंदाम यांच्या १० व सुरेश पेंदाम यांच्या दोन बकऱ्या अशा एकूण जवळपास अडीचशे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे या पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तेलंगणा राज्यातील गुंटूर येथील पी.व्यंकटरमन्ना, धनापती कट्टा व इतर चार शेतकऱ्यांनी बामणी व चेरपल्ली येथील ५०० एकरपेक्षा अधिक शेती केली आहे. या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, हे शेतकरी जे कीटकनाशक फवारत आहेत, त्याची चौकशी करावी, त्याचबरोबर संबंधित शेतकºयांवर दंड ठोठावून दंडाची रक्कम शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी गावातील पशुपालकांनी केली आहे.घटनेची माहिती मिळताच अहेरी नगर पंचायतीचे सभापती नारायण सिडाम, नगरसेवक संजय झाडे, सामाजिक कार्यकर्ते रिजवान शेख यांनी गावात जाऊन पशुपालकांची भेट घेतली. यावेळी घडलेला प्रसंग डोळ्यात अश्रू ढाळत शेतकरी सांगत होते.कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांना सुटते खाजकापूस वेचण्यासाठी ज्या महिला जात आहेत, त्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. चेहऱ्यावर सूज येत आहे. वृद्ध महिला मजुरांना गुडघा व हातपाय दुखण्याचा त्रास होत आहे. झाडाची पाने खाऊन आलेल्या बकरीचे लहान पिल्लू सुद्धा दूध पिल्यानंतर मरण पावत आहेत. यावरून कीटकनाशकांची तीव्रता किती भयानक असल्याचे दिसून येते.