शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

एमआयडीसीअभावी रखडला देसाईगंजचा औद्योगिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:56 IST

औद्योगिक विकासासाठी आवश्यक दळणवळण सुविधांपैकी एक असलेल्या रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव देसाईगंज शहर आहे.

ठळक मुद्देउद्योजकांची निराशा : रेल्वेमार्ग, पोषक वातावरण असूनही सरकारचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : औद्योगिक विकासासाठी आवश्यक दळणवळण सुविधांपैकी एक असलेल्या रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव देसाईगंज शहर आहे. तरीही या शहरात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी अद्याप औद्योगिक विकास महामंडळाने कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेला देसाईगंज तालुक्यात खिळ बसत आहे.देसाईगंज (वडसा) हे गडचिरोली जिल्ह्यातील दुसºया क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. व्यापारी आणि संपन्न शहर असणाºया देसाईगंजमधील अनेक छोटे-मोठे उद्योजक आपले उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. परंतू एमआयडीसी क्षेत्र नसल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळत नाही. सवलतीच्या दरात जागाही मिळत नाही. परिणामी त्यांना आपल्या संकल्पांवर पाणी सोडावे लागत आहे. यातून बेरोजगारीही वाढत आहे.वास्तविक औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये उद्योगासाठी पोषक वातावरण, सुविधा नसतानाही एमआयडीसी उभारण्यात आली आहे. परंतू देसाईगंजमध्ये दळणवळणाच्या सुविधा आहेत. रेल्वेमार्गावर असलेले हे जिल्ह्यातील एकमेव शहर आहे. लवकरच हे शहर राष्टÑीय महामार्गाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी औद्योगिक विकास झपाट्याने होऊ शकतो. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने या ठिकाणी एमआयडीसी मंजूर होऊ शकली नाही. जिल्ह्यात सध्या गडचिरोली आणि कुरखेडा तालुक्यात चिखली येथे एमआयडीसी क्षेत्र आहे. पण आवश्यक सुविधा आणि पोषक वातावरणाअभावी त्या ठिकाणी मोठे ठिकाणी उद्योग लागू शकले नाही. देसाईगंजमध्ये मात्र सर्व गोष्टी पोषक असताना आतापर्यंत एमआयडीसीच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार का घेतला नाही? असा प्रश्न नागरिकांना आणि उद्योगासाठी इच्छुक लोकांना पडला आहे.८५० एकर जागा रिकामी पडूनदेसाईगंजमध्ये पशुसंवर्धन विभागाची ८५० एकर जागा रिकामी पडून आहे. त्या ठिकाणी ५०० एकर जागेवर एमआयडीसी होणार असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून अनेकदा सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. स्थानिक पातळीपासून राज्य आणि केंद्रात भाजपची एकतर्फी सत्ता असताना एमआयडीसीची मंजुरीच काय, उद्योग येण्यासाठीही पोषक वातावरण आहे. राजकीय मंडळींनी इच्छाशक्ती दाखविल्यास हे काम सहज मार्गी लागेल, अशी अशा नागरिकांना आहे.नगर परिषदेचा ठराव अन् पाठपुरावादेसाईगंजमध्ये एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष देसा मोटवानी यांनी नगर परिषदेत ठराव मंजूर करून सरकारकडे पाठविला. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. उद्योग सचिवांची भेट घेऊन त्यांनाही या ठिकाणी एमआयडीसीकरिता उपलब्ध सुविधा आणि पोषक वातावरणाची जाणीव करून दिली. मात्र नंतरच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले, असे मोटवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सरकारने केवळ घोषणा न करता त्यांची अंमलबजावणीही करावी, असा टोला त्यांनी लावला.