शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करा

By admin | Updated: July 17, 2016 01:10 IST

बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही.

अपर्णा रामतीर्थकर यांचे आवाहन : चामोर्शीत सखी मंचतर्फे ‘चला... नाती जपू या!’ व्याख्यान कार्यक्रम चामोर्शी : बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही. बदलत्या काळानुसार नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊन कुटुंबात प्रसंगी नैराश्य पसरते. त्यामुळे दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करावे, असे आवाहन सोलापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड. अर्पणा रामतीर्थकर यांनी चामोर्शी येथे शुक्रवारी आयोजित ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमात केले. लोकमत सखी मंच चामोर्शी युनिक ग्रुपच्या वतीने ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमाच आयोजन स्थानिक केवळरामजी हरडे शिक्षण महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हिराजी बनपुरकर, मनोज पालारपवार, तालुका संयोजिका चैताली चांदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन राजश्री मुस्तीलवार तर आभार युनिक ग्रुप प्रमुख प्रेमा आर्इंचवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती भिमनवार, प्रीती भोगावार, स्वाती जिल्हेवार, प्राची भिवापुरे, रूपा दोशी, कांचन चकोर, सोनाली पालारपवार, संगीता करिंगलवार, लीला आर्इंचवार, तारा गांधी, रोशनी वरघंटे, ज्योती ओल्लालवार, मुमताज सय्यद, काजल सोमनकर, श्वेता पालारपवार व सखी सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) व्याख्यानातील कौंटुबिक मार्गदर्शन कुटुंबातील सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा, जावई-सासरे, माय-लेक यांच्या नातेसंबंधात अनेकदा दुफळी निर्माण होऊन नातेसंबंध बिघडत असतात. त्यामुळे या सर्व नात्यांमध्ये उत्कृष्ट प्रेमसंबंध निर्माण करून ते कायम ठेवणे गरजेचे आहे. आई-वडिलांनी मुला-मुलींवर सुसंस्कार करावे. धावपळीच्या जीवनातही पती-पत्नीने एक-दुसऱ्यांशी प्रेमपूर्वक वागावे, तेव्हाच कुटुंबात शांतता असते व सदस्यांमध्येही सौहार्दपूर्ण वातावरण असते. महिलांनी चूल व मूल सांभाळतांनाच संयुक्त कुटुंब पद्धती टिकवून ठेवता येईल, याकरिता प्रयत्न करावेत. समन्वय ठेवून कौंटुबिक समस्यांवर विचारमंथन करावे, असे मार्गदर्शन अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.