शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करा

By admin | Updated: July 17, 2016 01:10 IST

बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही.

अपर्णा रामतीर्थकर यांचे आवाहन : चामोर्शीत सखी मंचतर्फे ‘चला... नाती जपू या!’ व्याख्यान कार्यक्रम चामोर्शी : बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही. बदलत्या काळानुसार नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊन कुटुंबात प्रसंगी नैराश्य पसरते. त्यामुळे दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करावे, असे आवाहन सोलापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड. अर्पणा रामतीर्थकर यांनी चामोर्शी येथे शुक्रवारी आयोजित ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमात केले. लोकमत सखी मंच चामोर्शी युनिक ग्रुपच्या वतीने ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमाच आयोजन स्थानिक केवळरामजी हरडे शिक्षण महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हिराजी बनपुरकर, मनोज पालारपवार, तालुका संयोजिका चैताली चांदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन राजश्री मुस्तीलवार तर आभार युनिक ग्रुप प्रमुख प्रेमा आर्इंचवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती भिमनवार, प्रीती भोगावार, स्वाती जिल्हेवार, प्राची भिवापुरे, रूपा दोशी, कांचन चकोर, सोनाली पालारपवार, संगीता करिंगलवार, लीला आर्इंचवार, तारा गांधी, रोशनी वरघंटे, ज्योती ओल्लालवार, मुमताज सय्यद, काजल सोमनकर, श्वेता पालारपवार व सखी सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) व्याख्यानातील कौंटुबिक मार्गदर्शन कुटुंबातील सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा, जावई-सासरे, माय-लेक यांच्या नातेसंबंधात अनेकदा दुफळी निर्माण होऊन नातेसंबंध बिघडत असतात. त्यामुळे या सर्व नात्यांमध्ये उत्कृष्ट प्रेमसंबंध निर्माण करून ते कायम ठेवणे गरजेचे आहे. आई-वडिलांनी मुला-मुलींवर सुसंस्कार करावे. धावपळीच्या जीवनातही पती-पत्नीने एक-दुसऱ्यांशी प्रेमपूर्वक वागावे, तेव्हाच कुटुंबात शांतता असते व सदस्यांमध्येही सौहार्दपूर्ण वातावरण असते. महिलांनी चूल व मूल सांभाळतांनाच संयुक्त कुटुंब पद्धती टिकवून ठेवता येईल, याकरिता प्रयत्न करावेत. समन्वय ठेवून कौंटुबिक समस्यांवर विचारमंथन करावे, असे मार्गदर्शन अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.