शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करा

By admin | Updated: July 17, 2016 01:10 IST

बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही.

अपर्णा रामतीर्थकर यांचे आवाहन : चामोर्शीत सखी मंचतर्फे ‘चला... नाती जपू या!’ व्याख्यान कार्यक्रम चामोर्शी : बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही. बदलत्या काळानुसार नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊन कुटुंबात प्रसंगी नैराश्य पसरते. त्यामुळे दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करावे, असे आवाहन सोलापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अ‍ॅड. अर्पणा रामतीर्थकर यांनी चामोर्शी येथे शुक्रवारी आयोजित ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमात केले. लोकमत सखी मंच चामोर्शी युनिक ग्रुपच्या वतीने ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमाच आयोजन स्थानिक केवळरामजी हरडे शिक्षण महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हिराजी बनपुरकर, मनोज पालारपवार, तालुका संयोजिका चैताली चांदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन राजश्री मुस्तीलवार तर आभार युनिक ग्रुप प्रमुख प्रेमा आर्इंचवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती भिमनवार, प्रीती भोगावार, स्वाती जिल्हेवार, प्राची भिवापुरे, रूपा दोशी, कांचन चकोर, सोनाली पालारपवार, संगीता करिंगलवार, लीला आर्इंचवार, तारा गांधी, रोशनी वरघंटे, ज्योती ओल्लालवार, मुमताज सय्यद, काजल सोमनकर, श्वेता पालारपवार व सखी सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) व्याख्यानातील कौंटुबिक मार्गदर्शन कुटुंबातील सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा, जावई-सासरे, माय-लेक यांच्या नातेसंबंधात अनेकदा दुफळी निर्माण होऊन नातेसंबंध बिघडत असतात. त्यामुळे या सर्व नात्यांमध्ये उत्कृष्ट प्रेमसंबंध निर्माण करून ते कायम ठेवणे गरजेचे आहे. आई-वडिलांनी मुला-मुलींवर सुसंस्कार करावे. धावपळीच्या जीवनातही पती-पत्नीने एक-दुसऱ्यांशी प्रेमपूर्वक वागावे, तेव्हाच कुटुंबात शांतता असते व सदस्यांमध्येही सौहार्दपूर्ण वातावरण असते. महिलांनी चूल व मूल सांभाळतांनाच संयुक्त कुटुंब पद्धती टिकवून ठेवता येईल, याकरिता प्रयत्न करावेत. समन्वय ठेवून कौंटुबिक समस्यांवर विचारमंथन करावे, असे मार्गदर्शन अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.