शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नादुरूस्त ट्रॅक्टरने केला रस्ता जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:28 IST

रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले.

ठळक मुद्देवडसाच्या रेल्वे भूमिगत पुलावरील प्रकार : दूरदृष्टीकोनाअभावी सदर मार्गावर नेहमी वाहतुकीची कोंडी

आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. मात्र या ठिकाणी अतिशय अरूंद स्वरूपाचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे येथील दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शहरवासीयांना आला.लाखांदूर मार्गावरून काळी राख घेऊन येणारा ट्रॅक्टर ऐन भूमिगत पुलाच्या शेवटच्या टोकावर नादुरूस्त झाल्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली. परिणामी अनेक वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले.देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली असून रेल्वेच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील भागाच्या मधोमधून रेल्वे मार्ग गेला असल्याने दोन्ही भागांना जोडणारा हा भूयारी मार्ग नव्याने सुरू झालेला आहे. जड वाहने याच भूयारी मार्गाने आवागमन करीत आहेत. वारंवार बंद होणाºया रेल्वे फाटकावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने देसाईगंज येथे भूमिगत पुलाचे बांधकाम केले. मात्र रेल्वे प्रशासन तथा स्थानिक प्रशासनाने बांधकामाच्या बाबतीत भविष्याचा विचार केला नाही. तसेच याबाबत कोणताही दुरदृष्टीकोन बाळगला नाही. परिणामी क्षुल्लक कारणामुळे या मार्गावर अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.भूमिगत पुलाच्या दोन्ही बाजूमधून एकावेळी केवळ एकच वाहन काढता येते. त्यामुळे एखादे वाहन या ठिकाणी नादुरूस्त झाल्यास इतर वाहनधारकांची तारांबळ उडत असते. याचा प्रयत्य देसाईगंज शहरवासीयांना नेहमीच येत आहे. विशेष म्हणजे सकाळी १० वाजता असा प्रकार घडल्याने वाहनधारकांना मार्ग खुला होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.राख घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलाच्या शेवटच्या टोकावर नादुरूस्त झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक पुर्णत: ठप्प पडली. सदर प्रकार यापुढे होऊ नये, याकरिता रेल्वे व स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.