शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बदक पालनासाठी मिळणार प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:55 IST

शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर यांनी केले.

ठळक मुद्देगेवर्धात शेतकऱ्यांना प्रशिक्षण : लाभ घेण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गेवर्धा येथे शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. विक्रम कदम, कृषी अधिकारी किशोर सरदारे, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. मसराम, कृषी सहायक जी. के. जल्लेवार, कृषी मित्र योगेश नखाते, गेवर्धाचे सरपंच टिकाराम कोलेटी, उपसरपंच संदीप नखाते, पोलीस पाटील भाग्यरेखा वहतले आदी मान्यवर उपस्थित होते.जनावरांचे कृत्रिम रेतन करून जातीवंत पशुधनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करून घेतले पाहिजे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. निरगुडकर यांनी केले.संदीप कºहाडे यांनी सेंद्रीय भाजीपाला व सेंद्रीय शेतमालाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे शेतकºयांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन केले. तसेच सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश पवार यांनी भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, आळंबी उत्पादन, व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी जनावरांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने चारा लागवड करण्याचे आवाहन यावेळी केले. कृषी पर्यवेक्षक मसराम यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार किशोर सरदारे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.