शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

सेंद्रीय शेती उत्पादन-विक्री मेळाव्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:43 IST

गडचिराेली : परंपरागत कृषी विकास याेजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत १८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सेंद्रीय शेती उत्पादन विक्री मेळाव्याचे आयाेजन ...

गडचिराेली : परंपरागत कृषी विकास याेजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत १८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सेंद्रीय शेती उत्पादन विक्री मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम उपस्थित हाेते. प्रास्ताविकातून संदीप कऱ्हाळे यांनी मेळाव्याच्या आयाेजनाची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर, मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. गडचिराेली तालुक्यातील जिजाई सेंद्रीय पुरुष बचत गट नगरी यांना सेंद्रीय शेतीअंतर्गत अर्थसाहाय्याने खरेदी केलेल्या मालवाहक वाहनाची चावी गटाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांचे प्रतिनिधी यज्ञेश म्हशाखेत्री यांना साेपविण्यात आली. सेंद्रीय शेती गटामार्फत उत्पादित मालाच्या दालनास भेट देऊन पाहणी केली.

सेंद्रीय शेतीचे महत्त्व व सेंद्रीय उत्पादनाचे दरराेजच्या वापरातील फायदे याविषयी संदीप कऱ्हाळे यांनी समजावून सांगितले, तसेच कृषी चिकित्सालय व फळ राेपवाटिकेतील सेंद्रीय शेती उत्पादन-विक्री मेळाव्यास भेट देऊन सेंद्रीय शेती उत्पादनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डाॅ.अभिजीत कापगते यांनी मानले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक जिजाई सेंद्रीय पुरुष बचत गट, भुईमूग सेंद्रीय बचत गट अहेरी, कृषी शेतकरी मंडळ कुरखेडा, ओम साई सेंद्रीय शेतकरी गट चामाेर्शी, जय बंडेखंडी सेंद्रीय उत्पादक शेतकरी बचत गट एटापल्ली आदी पाच सेंद्रीय शेती बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व शेतकरी उपस्थित हाेते.

बाॅक्स ....

सेंद्रीय शेतमालासाठी बाजारपेठ निर्माण करा

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासह रबी हंगामातील क्षेत्र वाढविण्यास भर द्यावा. सिंचन क्षेत्रात वाढ करून सेंद्रीय भाजीपाला लागवड करावी. जमिनीचे संवर्धन करावे, दुर्गम व अतिदुर्गम भागात यांत्रिकीकरणाद्वारे शेती करण्यावर भर द्यावा. सेंद्रीय शेती याेजनेच्या अनुषंगाने बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आत्मा व कृषी विभागाने आवश्यक उपाययाेजना कराव्या, तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.