शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

बिनागुंडा परिसरात धान्य पोहोचविण्यास सुरुवात

By admin | Updated: May 21, 2016 01:25 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अतिशय दुर्गम भाग असलेल्या बिनागुंडा परिसरातील संपर्क

चार महिन्यांचा साठा रवाना : रस्तेही तयार करावे लागलेभामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अतिशय दुर्गम भाग असलेल्या बिनागुंडा परिसरातील संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे धान्य पोहोचविण्याच्या कामाला भामरागड तालुका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. भामरागड तालुक्यातील पावसाळी संपर्क तुटणाऱ्या अतिसंवेदनशील गावांमध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत जून ते सप्टेंबर या चार महिन्याकरिता लागणारे धान्य दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये पोहोचविले जाते. यावर्षी नवसंजीवन योजनेंतर्गत मिळणारे धान्य पोहोचविण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. १९ मे रोजी बिनागुंडा गावापासून याची सुरुवात करण्यात आली. बिनागुंडा येथील गावकऱ्यांच्या सहभागातून लाहेरी ते बिनागुंडा धान्य वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यात आला आणि जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचे धान्य भामरागड तहसीलचे पुरवठा निरीक्षक ए. टी. भंडारवाड यांच्या उपस्थितीत बिनागुंडा येथे उतरविण्यात आले. यावेळी भंडारवाड यांनी स्वत: सदर गावातील नागरिकांना धान्याचे वितरण केले. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल या गावातील नागरिकांनी प्रशासनाबद्दल आस्था व्यक्त केली. पुढील चार महिने या भागाचा संपर्क तुटलेला राहतो. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने मे महिन्याच्या मध्यांतच हे काम हाती घेतले आहे. (तालुका प्रतिनिधी)