शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कोंबडी पळेना... लंगडी घालाया लागली...; कुक्कुट उत्पादकांसमोर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2023 08:15 IST

Gadchiroli News कोंबड्याचे पाय अचानकच लुळे पडून त्यांचा तोल जात आहे. त्यानंतर त्यांना पायाने नीट चालता येत नाही. शरीर खंगून नंतर त्यांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

गोपाल लाजूरकर

गडचिराेली : जत्रा या मराठी चित्रपटातील कोंबडी पळाली, तंगडी धरून... लंगडी घालाया लागली... हे गीत प्रसिध्द आहे. जिल्ह्यात मात्र, सध्या कोंबडी पळेचना... खरोखरच लंगडी घालायला लागल्याच्या कुुक्कुट उत्पादकांच्या तक्रारी आहेत.

कोंबड्याचे पाय अचानकच लुळे पडून त्यांचा तोल जात आहे. त्यानंतर त्यांना पायाने नीट चालता येत नाही. शरीर खंगून नंतर त्यांचा मृत्यू होण्याचा धोका आहे.

उन्हाचा पारा वाढताच राणीखेत या विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले आहे, त्यामुळे उत्पादकांसमोर संकट निर्माण झाले आहे.

उन्हाळ्यात काेंबड्यांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी हाेते. अशावेळी त्यांना समतोल आहार, शुद्ध हवेची आवश्यकता भासते. परंतु, याच काळात विपरीत वातावरण लाभते. तापमानवाढीमुळे काेबड्यांमधील राेग प्रतिकारशक्ती कमी हाेते. परिणामी त्यांच्या रोगजंतूंचा प्रवेश हाेताे. काेंबड्यांवर विविध राेगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्यात मरतुकीचे प्रमाण वाढतेच, शिवाय प्रजनन क्षमता कमी होऊन अंडी उत्पादनही घटते.

राणीखेत राेगाची लक्षणे काय?

राणीखेत हा रोग विषाणूजन्य राेग आहे. लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली हाेणे आदी लक्षणे दिसतात. तर मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोच्छवास, मंद भूक, ताप येणे, पांढरी पातळ हगवण, मान वाकडी होणे, निकृष्ट दर्जाची अंडी आदी लक्षणे दिसतात.

जनावरांचे लसीकरण मग काेंबड्यांचे का नाही?

जनावरांवर राेगाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जि. प. पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण माेहीम राबविली जाते. त्यामुळे जनावरे सुरक्षित हाेतात. परंतु, काेंबड्यांच्या बाबतीत ही माेहीम राबविली जात नाही. उन्हाळ्यात काेंबड्यांची राेगप्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने त्यांच्यावर विविध राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. त्यादृष्टीने काेंबड्यांवर लसीकरण का केले जात नाही, असा प्रश्न आहे.

लसीचा तुटवडा

गडचिराेली जिल्ह्यात बऱ्यापैकी काेंबड्या पाळल्या जातात. काेंबड्यांचा प्रजनन दर माेठा असल्याने त्यांची संख्या निश्चत कधीच सांगता येत नाही. जी व्यक्ती काेंबड्या पाळते त्यांना सहज लस उपलब्ध करून देणे गरजेचे असते; परंतु तसे हाेत नाही. अनेकदा लसीचा तुटवडा जाणवताे. आतासुद्धा तीच स्थिती आहे. स्थानिक अधिकारी किंवा कर्मचारी कुक्कुटपालकांना याबाबत याेग्य मार्गदर्शन करत नाहीत.

 

राेगग्रस्त काेंबड्या धाेकादायक

ग्रामीण भागात दरवर्षीच उन्हाळ्यात तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला काेंबड्यांवर विषाणूजन्य राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. उपचाराअभावी अनेक काेंबड्या मरतात. काही कुक्कुटपालक मेलेल्या काेंबड्या फेकून देतात तर काहीजण काेबडी वाया का जाऊ द्यावी म्हणून त्या घरीच कापून शिजवून खातात. परंतु, प्रश्न अशा राेगग्रस्त काेंबड्या खाण्यायोग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

काय खबरदारी घ्यावी?

उन्हाळ्यात राेगप्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने काेंबड्यांचे लसीकरण करावे. त्यांचे उन्हापासून संरक्षण करावे. सामान्य तापमान कसे राखता येईल, यासाठी खुराड्याभोवती रिकामी पाेती किंवा गाेणपाटांपासून थंडावा द्यावा. राणीखेत असाे वा अन्य राेगांमुळे मेलेल्या काेंबड्या कधीच खाऊ नयेत. तसेच राेगग्रस्त काेंबड्यांच्या संपर्कात इतर काेंबड्या येऊ देऊ नयेत.

 

उन्हाळ्यात राेगप्रतिकारशक्ती कमी हाेत असल्याने काेंबड्यांवर विविध राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. सध्या जर काेंबड्यांवर राेगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांना पशुचिकित्सालयात घेऊन जावे. काेंबड्यांच्या आजारावरील लक्षणे पाहून व त्यांचे रक्त नमुने घेतल्यानंतर तपासणीनंतरच नेमका काेणता राेग त्यांना झाला आहे, हे सांगता येईल.

-डाॅ. विलास गाडगे, उपायुक्त, पशुसंवर्धन उपायुक्तालय, गडचिराेली

टॅग्स :agricultureशेती