शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

चांगल्या प्रसिद्धीतूनच उजळेल गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:05 IST

या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अपेक्षा : ८० गावांत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही. प्रसार माध्यमांनी केवळ वाईट गोष्टींवरच बोट न ठेवता चांगल्या कामांनाही प्रसिद्धी दिली पाहीजे. त्यातूनच जिल्ह्याची प्रतिमा उजळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बुधवानी यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्रेहमिलन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येथील अलंकार टॉकीजमध्ये बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, १९२ बटालियनचे कमांडंट मनोज कुमार, आणि आयोजक सलीम बुधवानी मंचावर विराजमान होते.यावेळी पालकमंत्री म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आज विकासाच्या प्रकाशापासून दूर आहेत. ८० गावांत अजूनही कित्येक वर्षात वीज पोहोचली नाही. अमडेली गावात मी वीज पोहोचविली. त्यावेळी तेथील लोकांच्या चेहºयावर दिसलेला आनंद मला आतापर्यंत वीज न पोहोचलेल्या सर्व गावकºयांच्या चेहºयावर पहायचा आहे. पण त्यासाठी अनेक अडचणी आहेत. अनेक परवानगींचे अडथळे पार करून ते काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राष्टÑीय एकात्मतेसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वक्त्यांनी बुधवानी यांचे कौतुक करून असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.‘ती’ बस होती केवळ चाचणीसाठीअमडेली गावात महिनाभरापूर्वी पहिल्यांचा एसटी बस घेऊन पालकमंत्री पोहोचले. परंतु नंतर ती बस गावात गेलीच नसल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. त्याबद्दल बोलताना पालकमंत्र्यांनी म्हणाले, ती बस नियमित फेरीसाठी नेली नव्हतीच. गावात बस जाऊ शकते का, याची चाचणी घेण्यासाठीच ती बस नेली होती. परंतु रस्ता दुरूस्त झाल्यानंतर ती बस नियमितपणे गावात जाईल. तो रस्ता दुरूस्त करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले आहेत. निविदा प्रक्रिया आटोपून लवकरच हे काम सुरू होईल व नंतर बसफेरी सुरू केली जाईल, असे त्यांनी भाषणात सांगितले.