शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
3
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
4
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
5
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
6
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
7
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
8
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
9
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
10
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
11
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
12
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
13
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
14
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
15
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
16
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
17
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
18
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
19
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
20
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

चांगल्या प्रसिद्धीतूनच उजळेल गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:05 IST

या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अपेक्षा : ८० गावांत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही. प्रसार माध्यमांनी केवळ वाईट गोष्टींवरच बोट न ठेवता चांगल्या कामांनाही प्रसिद्धी दिली पाहीजे. त्यातूनच जिल्ह्याची प्रतिमा उजळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बुधवानी यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्रेहमिलन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येथील अलंकार टॉकीजमध्ये बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, १९२ बटालियनचे कमांडंट मनोज कुमार, आणि आयोजक सलीम बुधवानी मंचावर विराजमान होते.यावेळी पालकमंत्री म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आज विकासाच्या प्रकाशापासून दूर आहेत. ८० गावांत अजूनही कित्येक वर्षात वीज पोहोचली नाही. अमडेली गावात मी वीज पोहोचविली. त्यावेळी तेथील लोकांच्या चेहºयावर दिसलेला आनंद मला आतापर्यंत वीज न पोहोचलेल्या सर्व गावकºयांच्या चेहºयावर पहायचा आहे. पण त्यासाठी अनेक अडचणी आहेत. अनेक परवानगींचे अडथळे पार करून ते काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राष्टÑीय एकात्मतेसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वक्त्यांनी बुधवानी यांचे कौतुक करून असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.‘ती’ बस होती केवळ चाचणीसाठीअमडेली गावात महिनाभरापूर्वी पहिल्यांचा एसटी बस घेऊन पालकमंत्री पोहोचले. परंतु नंतर ती बस गावात गेलीच नसल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. त्याबद्दल बोलताना पालकमंत्र्यांनी म्हणाले, ती बस नियमित फेरीसाठी नेली नव्हतीच. गावात बस जाऊ शकते का, याची चाचणी घेण्यासाठीच ती बस नेली होती. परंतु रस्ता दुरूस्त झाल्यानंतर ती बस नियमितपणे गावात जाईल. तो रस्ता दुरूस्त करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले आहेत. निविदा प्रक्रिया आटोपून लवकरच हे काम सुरू होईल व नंतर बसफेरी सुरू केली जाईल, असे त्यांनी भाषणात सांगितले.