शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

चांगल्या प्रसिद्धीतूनच उजळेल गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:05 IST

या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अपेक्षा : ८० गावांत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : या जिल्ह्याचे चित्र प्रसार माध्यमांनी जसे मांडले तसे ते महाराष्टÑाला दिसते. परंतु हा जिल्हा जसा भासविला जातो तसा वाईट नाही. प्रसार माध्यमांनी केवळ वाईट गोष्टींवरच बोट न ठेवता चांगल्या कामांनाही प्रसिद्धी दिली पाहीजे. त्यातूनच जिल्ह्याची प्रतिमा उजळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केली.भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बुधवानी यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्रेहमिलन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. येथील अलंकार टॉकीजमध्ये बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक टी.शेखर, १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, १९२ बटालियनचे कमांडंट मनोज कुमार, आणि आयोजक सलीम बुधवानी मंचावर विराजमान होते.यावेळी पालकमंत्री म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सण म्हणजे दिवाळी आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आज विकासाच्या प्रकाशापासून दूर आहेत. ८० गावांत अजूनही कित्येक वर्षात वीज पोहोचली नाही. अमडेली गावात मी वीज पोहोचविली. त्यावेळी तेथील लोकांच्या चेहºयावर दिसलेला आनंद मला आतापर्यंत वीज न पोहोचलेल्या सर्व गावकºयांच्या चेहºयावर पहायचा आहे. पण त्यासाठी अनेक अडचणी आहेत. अनेक परवानगींचे अडथळे पार करून ते काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर पाहुण्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राष्टÑीय एकात्मतेसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वक्त्यांनी बुधवानी यांचे कौतुक करून असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.‘ती’ बस होती केवळ चाचणीसाठीअमडेली गावात महिनाभरापूर्वी पहिल्यांचा एसटी बस घेऊन पालकमंत्री पोहोचले. परंतु नंतर ती बस गावात गेलीच नसल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. त्याबद्दल बोलताना पालकमंत्र्यांनी म्हणाले, ती बस नियमित फेरीसाठी नेली नव्हतीच. गावात बस जाऊ शकते का, याची चाचणी घेण्यासाठीच ती बस नेली होती. परंतु रस्ता दुरूस्त झाल्यानंतर ती बस नियमितपणे गावात जाईल. तो रस्ता दुरूस्त करण्यासाठी अडीच कोटी रुपये दिले आहेत. निविदा प्रक्रिया आटोपून लवकरच हे काम सुरू होईल व नंतर बसफेरी सुरू केली जाईल, असे त्यांनी भाषणात सांगितले.