शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:07 IST

वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.

ठळक मुद्देशेकडो रोपटे कोमेजली : शासनाच्या आदेशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.पर्यावरण संतुलनात झाडांचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने राज्य शासन राज्यातील विविध विभागांना झाडे लावण्याचे उद्दिष्ट देते. यावर्षी राज्य शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला सुध्दा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. आष्टी परिसरातील इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करण्यासाठी ३०० रोपटे आणली होती. यातील जवळपास २०० रोपटे लावण्यात आले. उर्वरित १०० रोपटे इल्लुर येथील समाज मंदिरासमोर बेवारस स्थितीत पडून आहेत. ये-जा करणारी जनावरे रोपटे खात असल्याने यातील काही रोपटे करपली आहेत. अगदी समाज मंदिराच्या पायऱ्यांसमोर रोपटे पडून आहेत.एकीकडे शासन प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे इल्लुर ग्रामपंचायतीचे प्रशासन शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. ही सर्वच रोपटे खरेदी करून आणली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे पैसे वाया गेले आहेत. सदर रक्कम ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंच व इतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी इल्लुर येथील नागरिकांकडून होत आहे. तसेच शासन आदेश धुडकाविणाऱ्या सचिवावरही कारवाईची मागणी आहे.जनतेच्या पैशाचा अपव्ययवृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक झाड खरेदी करावे लागते. वृक्ष लागवडीसाठी शासन ग्रामपंचायतीला एकही पैसा देत नाही. वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीला स्वत:च्या निधीतून खर्च करावा लागतो. नागरिक पदरमोड करून ग्रामपंचायतीकडे कराचा भरणा करतात. नागरिकांचा हा पैसा सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षामुळे असा वाया जात आहे. त्यामुळे याची चौकशी करून कारवाईची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत