शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:07 IST

वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.

ठळक मुद्देशेकडो रोपटे कोमेजली : शासनाच्या आदेशाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत.पर्यावरण संतुलनात झाडांचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने राज्य शासन राज्यातील विविध विभागांना झाडे लावण्याचे उद्दिष्ट देते. यावर्षी राज्य शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला सुध्दा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. आष्टी परिसरातील इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करण्यासाठी ३०० रोपटे आणली होती. यातील जवळपास २०० रोपटे लावण्यात आले. उर्वरित १०० रोपटे इल्लुर येथील समाज मंदिरासमोर बेवारस स्थितीत पडून आहेत. ये-जा करणारी जनावरे रोपटे खात असल्याने यातील काही रोपटे करपली आहेत. अगदी समाज मंदिराच्या पायऱ्यांसमोर रोपटे पडून आहेत.एकीकडे शासन प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे इल्लुर ग्रामपंचायतीचे प्रशासन शासनाच्या उद्देशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. ही सर्वच रोपटे खरेदी करून आणली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे पैसे वाया गेले आहेत. सदर रक्कम ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंच व इतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी इल्लुर येथील नागरिकांकडून होत आहे. तसेच शासन आदेश धुडकाविणाऱ्या सचिवावरही कारवाईची मागणी आहे.जनतेच्या पैशाचा अपव्ययवृक्ष लागवड योजनेंतर्गत प्रत्येक झाड खरेदी करावे लागते. वृक्ष लागवडीसाठी शासन ग्रामपंचायतीला एकही पैसा देत नाही. वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीला स्वत:च्या निधीतून खर्च करावा लागतो. नागरिक पदरमोड करून ग्रामपंचायतीकडे कराचा भरणा करतात. नागरिकांचा हा पैसा सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षामुळे असा वाया जात आहे. त्यामुळे याची चौकशी करून कारवाईची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत