शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

५०० टन लाकडाची अवैध वाहतूक

By admin | Updated: October 4, 2014 23:26 IST

येथून जवळच असलेल्या कासवी येथील प्रसिध्द आमराईतील आम्रवृक्षाची अवैध तोड सुरूच आहे. तोड केलेल्या ५०० टन आम्रलठ्ठ्याची खुलेआम वाहतूक होत आहे. मात्र याकडे वनविभागाच्या वरिष्ठ

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या कासवी येथील प्रसिध्द आमराईतील आम्रवृक्षाची अवैध तोड सुरूच आहे. तोड केलेल्या ५०० टन आम्रलठ्ठ्याची खुलेआम वाहतूक होत आहे. मात्र याकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वनविभागाचे वनोपज तपासणी नाके बंद झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वन अधिनियम १९६४ च्या तरतुदीनुसार १६ प्रजातीच्या यादीमध्ये आंबा या झाडाची अधिसूचित यादीमध्ये नोंद आहे. त्यामुळे आम्रवृक्ष तोडण्यापूर्वी शासकीय दस्ताऐवजाची पूर्तता करण्यासाठी फार वेळ जात असतो. अशा वृक्षाची तोड करण्यासाठी वनविभाग व महसूल विभाग व तालुका निरिक्षक यांच्याकडून संयुक्त सीमांकन करणे आवश्यक आहे. मात्र सध्या कासवी येथे सुरू असलेल्या आम्रवृक्षाच्या तोड प्रकरणात सीमांकन केल्याचे कोणतेही चिन्ह वृक्षतोडीच्या ठिकाणी नाही, असे दिसून येते. सातबारावर झाडाची मालकी जातवार शेतकऱ्यांची की आंबा राखणाऱ्यांची तसेच या दोघांची मालकी नसेल तर ती संपत्ती शासकीय असल्याचे नमुद आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रपत्र ५, मालकी प्रमाणपत्र उपविभागीय वडसा यांचे आदेश आणि कोणत्या कारणास्तव ऐवढ्या मोठ्या फळ झाडांची समुळ नायनाट करण्यात येत आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांचे पत्रही नाही. आम्रवृक्षावर मार्कींग नाही तसेच तोडलेल्या खुंटावर आणि लठ्ठ्यावर क्रमांकानुसार वाहतूक परवान्याचे हॅमर असणे गरजेचे आहे. मात्र अशाबाबतची कोणतीही प्रक्रिया वनविभागामार्फत कासवीच्या आमराईतील तोड प्रकरणात करण्यात आल्याचे दिसून येत नाही. आम्रवृक्षाची तोड करून प्लायवुडनिर्मिती कारखान्यामध्ये आम्रवृक्षाचे तोडलेले लठ्ठे पुरविल्या जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कासवी येथून लाकडाची अवैध वाहतूक केली जात आहे. मात्र संबंधीत तलाठी, वनविभाग आणि वनोपज तपासणी नाक्यांमार्फत कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. सदर अवैध वृक्षतोड व वाहतूक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)