शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

५०० टन लाकडाची अवैध वाहतूक

By admin | Updated: October 4, 2014 23:26 IST

येथून जवळच असलेल्या कासवी येथील प्रसिध्द आमराईतील आम्रवृक्षाची अवैध तोड सुरूच आहे. तोड केलेल्या ५०० टन आम्रलठ्ठ्याची खुलेआम वाहतूक होत आहे. मात्र याकडे वनविभागाच्या वरिष्ठ

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या कासवी येथील प्रसिध्द आमराईतील आम्रवृक्षाची अवैध तोड सुरूच आहे. तोड केलेल्या ५०० टन आम्रलठ्ठ्याची खुलेआम वाहतूक होत आहे. मात्र याकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वनविभागाचे वनोपज तपासणी नाके बंद झाले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वन अधिनियम १९६४ च्या तरतुदीनुसार १६ प्रजातीच्या यादीमध्ये आंबा या झाडाची अधिसूचित यादीमध्ये नोंद आहे. त्यामुळे आम्रवृक्ष तोडण्यापूर्वी शासकीय दस्ताऐवजाची पूर्तता करण्यासाठी फार वेळ जात असतो. अशा वृक्षाची तोड करण्यासाठी वनविभाग व महसूल विभाग व तालुका निरिक्षक यांच्याकडून संयुक्त सीमांकन करणे आवश्यक आहे. मात्र सध्या कासवी येथे सुरू असलेल्या आम्रवृक्षाच्या तोड प्रकरणात सीमांकन केल्याचे कोणतेही चिन्ह वृक्षतोडीच्या ठिकाणी नाही, असे दिसून येते. सातबारावर झाडाची मालकी जातवार शेतकऱ्यांची की आंबा राखणाऱ्यांची तसेच या दोघांची मालकी नसेल तर ती संपत्ती शासकीय असल्याचे नमुद आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रपत्र ५, मालकी प्रमाणपत्र उपविभागीय वडसा यांचे आदेश आणि कोणत्या कारणास्तव ऐवढ्या मोठ्या फळ झाडांची समुळ नायनाट करण्यात येत आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांचे पत्रही नाही. आम्रवृक्षावर मार्कींग नाही तसेच तोडलेल्या खुंटावर आणि लठ्ठ्यावर क्रमांकानुसार वाहतूक परवान्याचे हॅमर असणे गरजेचे आहे. मात्र अशाबाबतची कोणतीही प्रक्रिया वनविभागामार्फत कासवीच्या आमराईतील तोड प्रकरणात करण्यात आल्याचे दिसून येत नाही. आम्रवृक्षाची तोड करून प्लायवुडनिर्मिती कारखान्यामध्ये आम्रवृक्षाचे तोडलेले लठ्ठे पुरविल्या जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कासवी येथून लाकडाची अवैध वाहतूक केली जात आहे. मात्र संबंधीत तलाठी, वनविभाग आणि वनोपज तपासणी नाक्यांमार्फत कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. सदर अवैध वृक्षतोड व वाहतूक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)