शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 15, 2014 00:08 IST

आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

गडचिरोली : आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे या मार्गावरून गावकरी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करीत आहेत. सदर पुलांची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मागील १ महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आठ दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला. या पूरात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असलेले पूल तुटले आहेत. दुर्गम भागातील जवळपास असे २० पूल तुटले आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे व पुरामुळे अनेक मार्ग खरडून गेले आहेत. या मार्गावर मोठ- मोठे खड्डे पडले असल्याने मार्गक्रमण करणे, अशक्य झाले आहे. भामरागड, एटापल्ली, कोरची, सिरोंचा, धानोरा या दुर्गम भागातील नागरिक बऱ्याचवेळा तक्रार करीत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या समस्या लक्षात येत नाही. पूल तुटल्याने मार्ग खरडून गेल्याने मागील आठ दिवसांपासून या गावांमधील नागरिकांना दुसऱ्या गावी जाणे शक्य होत नाही. काही गावातील विद्यार्थी नाल्याच्या पाण्यातून प्रवास करीत आहेत. एखादे दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंदाज चुकून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील पूल व रस्त्यांची दूरवस्था झाली असल्याने ग्रामसेवक, तलाठी यांनी जाणेच बंद केले आहे. त्यामुळे या गावांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर सदर समस्या किमान एक महिना मार्गी न लावण्याची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासनाला सवयच झाली आहे. (नगर प्रतिनिधी)