शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 15, 2014 00:08 IST

आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

गडचिरोली : आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान- मोठे पुले वाहून गेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील गिट्टी उखळली असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आठ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे या मार्गावरून गावकरी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करीत आहेत. सदर पुलांची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मागील १ महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आठ दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आला. या पूरात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असलेले पूल तुटले आहेत. दुर्गम भागातील जवळपास असे २० पूल तुटले आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे व पुरामुळे अनेक मार्ग खरडून गेले आहेत. या मार्गावर मोठ- मोठे खड्डे पडले असल्याने मार्गक्रमण करणे, अशक्य झाले आहे. भामरागड, एटापल्ली, कोरची, सिरोंचा, धानोरा या दुर्गम भागातील नागरिक बऱ्याचवेळा तक्रार करीत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या समस्या लक्षात येत नाही. पूल तुटल्याने मार्ग खरडून गेल्याने मागील आठ दिवसांपासून या गावांमधील नागरिकांना दुसऱ्या गावी जाणे शक्य होत नाही. काही गावातील विद्यार्थी नाल्याच्या पाण्यातून प्रवास करीत आहेत. एखादे दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर अंदाज चुकून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील पूल व रस्त्यांची दूरवस्था झाली असल्याने ग्रामसेवक, तलाठी यांनी जाणेच बंद केले आहे. त्यामुळे या गावांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा मागील आठ दिवसांपासून बंद आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर सदर समस्या किमान एक महिना मार्गी न लावण्याची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रशासनाला सवयच झाली आहे. (नगर प्रतिनिधी)