शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

गोडाऊन नसेल तरी धान खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:16 IST

आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकुरखेड्याला भेट : आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी केले.जिल्ह्याच्या तीन दिवशीय दौºयावर नितीन पाटील आले असता त्यांनी गुरूवारी आविमच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन धान खरेदी व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आ.कृष्णा गजबे, प्रादेशिक व्यवस्थापक जे.पी. राजुरकर, अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुळेवार, कुरखेडाचे नीलेश सोरपडे उपस्थित होते. रबी धान प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या शंका संदर्भात जाब विचारण्याकरिता परिवर्तन संघटनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक कार्यालयावर धडक देऊन नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली.कुरखेडा तालुक्यात रबी हंगामात १० पैकी केवळ एकच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. माल साठवणुकीकरिता पुरेशा प्रमाणात संस्थांकडे गोडाऊनची व्यवस्था नसल्याची सबब सांगितली. त्यामुळे उर्वरित नऊ खरेदी केंद्रांबाबत शंका निर्माण झाली. खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या हजारो क्विंटल धानाची उचल न झाल्याने संस्थांच्या पटांगणात ते उघड्यावर पडून आहेत. खराब हवामानाचा फटका धानाला बसत आहे. तरी सुद्धा तूट निर्माण झाल्यास संस्थांना जबाबदार धरून वसुली करण्यात येते. वास्तविक विहीत मुदतीत मालाची उचल होणे गरजेचे आहे. परंतु महामंडळाकडून होणाºया दिरंगाईचा फटका संस्थांना सोसावा लागतो. खरेदी संस्थांना मालाच्या सुरक्षिततेकरिता पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांचा पुरवठा करण्यात आलेला नाही, आदी समस्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालकांसमोर मांडल्या. यावर नितीन पाटील यांनी खरेदी संस्थांकडे गोडाऊन असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात येणार नाही, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, विलास गावंडे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागिलवार, आविका पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव फाये, आशिष काळे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, विनोद खुणे, मधुकर शेंडे, तेजराम बुद्धे, दशरथ लाडे, माधव तलमले, हेमंत शेंद्रे, सुधाकर वैरागडे, अनिल उईके, गुणाजी कवाडकर व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.ताडपत्र्या उपलब्ध होणारधानाच्या संरक्षणाकरिता महामंडळाने ६५ लाख रुपयांची ताडपत्री खरेदीची निविदा काढलेली आहे. संबंधित यंत्रणेला ७ लाख ५० हजार बारदाना पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे, असे नितीन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी