शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

गोडाऊन नसेल तरी धान खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:16 IST

आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकुरखेड्याला भेट : आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी केले.जिल्ह्याच्या तीन दिवशीय दौºयावर नितीन पाटील आले असता त्यांनी गुरूवारी आविमच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन धान खरेदी व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आ.कृष्णा गजबे, प्रादेशिक व्यवस्थापक जे.पी. राजुरकर, अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुळेवार, कुरखेडाचे नीलेश सोरपडे उपस्थित होते. रबी धान प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या शंका संदर्भात जाब विचारण्याकरिता परिवर्तन संघटनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक कार्यालयावर धडक देऊन नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली.कुरखेडा तालुक्यात रबी हंगामात १० पैकी केवळ एकच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. माल साठवणुकीकरिता पुरेशा प्रमाणात संस्थांकडे गोडाऊनची व्यवस्था नसल्याची सबब सांगितली. त्यामुळे उर्वरित नऊ खरेदी केंद्रांबाबत शंका निर्माण झाली. खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या हजारो क्विंटल धानाची उचल न झाल्याने संस्थांच्या पटांगणात ते उघड्यावर पडून आहेत. खराब हवामानाचा फटका धानाला बसत आहे. तरी सुद्धा तूट निर्माण झाल्यास संस्थांना जबाबदार धरून वसुली करण्यात येते. वास्तविक विहीत मुदतीत मालाची उचल होणे गरजेचे आहे. परंतु महामंडळाकडून होणाºया दिरंगाईचा फटका संस्थांना सोसावा लागतो. खरेदी संस्थांना मालाच्या सुरक्षिततेकरिता पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांचा पुरवठा करण्यात आलेला नाही, आदी समस्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालकांसमोर मांडल्या. यावर नितीन पाटील यांनी खरेदी संस्थांकडे गोडाऊन असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात येणार नाही, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, विलास गावंडे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागिलवार, आविका पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव फाये, आशिष काळे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, विनोद खुणे, मधुकर शेंडे, तेजराम बुद्धे, दशरथ लाडे, माधव तलमले, हेमंत शेंद्रे, सुधाकर वैरागडे, अनिल उईके, गुणाजी कवाडकर व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.ताडपत्र्या उपलब्ध होणारधानाच्या संरक्षणाकरिता महामंडळाने ६५ लाख रुपयांची ताडपत्री खरेदीची निविदा काढलेली आहे. संबंधित यंत्रणेला ७ लाख ५० हजार बारदाना पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे, असे नितीन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी