शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

भाजपला सत्ता दिल्यास धानोरा आदर्श ग्राम बनविणार

By admin | Updated: November 4, 2015 01:57 IST

धानोरा गावाला आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या हाती एकहाती सत्ता द्या, असे

धानोरा : धानोरा गावाला आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या हाती एकहाती सत्ता द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. सोमवारी रात्री धानोरा येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, गडचिरोली जिल्हा बँकेचे सचिव अनंत साळवे, कैैलास गुंडावार, नंदकिशोर काबरा, गजानन साळवे, प्रकाश गेडाम, प्रकाश अर्जुनवार, साईनाथ साळवे, रमेश भुरसे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक शशिकांत साळवे, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, धानोरा ग्राम पंचायतमध्ये मागील १५ वर्ष काँग्रेसची सत्ता होती. परंतु जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहे. पाणीपुरवठा, विद्युत समस्या, रस्ते यासाठी निधीची आवश्यकता असते, केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे धानोरा गावातही भाजपचे सरकार द्या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. निवडणूक काळात जे राजकीय पक्ष पैसे देतील, त्या पैशातून दिवाळी साजरी करा, मात्र मतदान भाजपला करा, असा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला. यावेळी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी धानोरात सहा सभा घेतल्या.भाजपलाही कोरचीच्या विकासाची एक संधी द्या४पश्चिम महाराष्ट्राचे पालकमंत्री सहा-सहा महिने येत नव्हते. मंत्रालयात बसून गडचिरोलीच्या विकासाबाबत नियोजन केले जात होते. त्यामुळेच जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. मी या जिल्ह्याचा मुलगा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मनापासून झटणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. मंगळवारी कोरची येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या जाहीर सभेला आ. क्रिष्णा गजबे, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, सभापती अवधराम बागमुळ, भाजपा तालुकाध्यक्ष आनंद चौबे, नसरूद्दीन भामानी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी आ. क्रिष्णा गजबे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने १५ वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे कोरची परिसर अविकसित राहिला आहे. भाजपला सत्ता दिल्यास या भागाच्या विकासालाही आम्ही चालना देऊ. त्यामुळे आम्हाला एक संधी द्या, असे आवाहन आ. गजबे यांनी केले. आमदार बनल्यापासून आपली कोरचीला ही चवथी भेट आहे. मतदारांनी भाजपावर विश्वास ठेवत एकहाती सत्ता देण्यासाठी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. सभेचे संचालन प्रा. गजभिये तर आभार प्रभाकर मानकर यांनी मानले. बसस्टँडसमोर झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)