शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लाभार्थ्यांनाे घरकुल पाहिजे, तर २० मार्चपूर्वी अर्ज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

 ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान आवास याेजनेची मुदत ३१ मार्च २०२२ राेजी संपत आहे. या याेजनेला केंद्र शासनाने मुदतवाढ दिली नाही तर या याेजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च राहणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी तुमचा अर्ज २० मार्चपूर्वीच नगर परिषदेत सादर हाेणे आवश्यक आहे.  ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. गडचिराेली शहरातील अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. शासनाने याचवर्षी याेजना बंद केल्यास अनेकांना घरकुलापासून वंचित राहावे लागणार आहे. दिवसेंदिवस शहरात झाेपडपट्टी बांधून राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

३०० अर्जांच्या  छाननीची प्रक्रिया सुरू मुदतवाढ न मिळाल्यास ३१ मार्चनंतर अर्ज स्वीकारता येणार नाही. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत असल्याने शहरातील पात्र नागरिकांकडून फेब्रुवारी महिन्यातच अर्ज मागविण्यात आले हाेते. जवळपास ३०० अर्ज प्राप्त झाले. त्याचा डीपीआर बनवून म्हाडा मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. हे अर्ज ३१ मार्चपूर्वीचे असल्याने त्यांना लाभ मिळणार आहे. 

-    शहरात घरकुलासाठी गावठाण किंवा स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली शहरातील गाेकूलनगर, इंदिरानगर हे वाॅर्ड सरकारी जागेवर अतिक्रमण करून वसली आहेत. अतिक्रमीत जागेवर या याेजनेचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे या वाॅर्डांमधील अनेक नागरिक याेजनेपासून वंचित आहेत. 

ग्रामीण भागातील नागरिकांप्रमाणेच शहरातीलही अनेक नागरिकांकडे स्वत:चे पक्के घर नाहीत. शहरात घर बांधण्याचा खर्च अधिक आहे. राेजी राेटी करणारा व्यक्ती शहरात घर बांधू शकत नाही. शासनाने याेजना बंद न करता ती चालू ठेवावी. स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न राहते. हे स्वप्न सरकारच्या सहकार्याशिवाय पूर्ण हाेेणे शक्य नाही. - स्वप्नील खाेब्रागडे, नागरिक

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना