शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

लाभार्थ्यांनाे घरकुल पाहिजे, तर २० मार्चपूर्वी अर्ज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

 ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पंतप्रधान आवास याेजनेची मुदत ३१ मार्च २०२२ राेजी संपत आहे. या याेजनेला केंद्र शासनाने मुदतवाढ दिली नाही तर या याेजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३१ मार्च राहणार आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी तुमचा अर्ज २० मार्चपूर्वीच नगर परिषदेत सादर हाेणे आवश्यक आहे.  ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनामार्फत १.५ लाख रुपये असा एकूण २.५ लाख रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलासाठी दिला जातो. गडचिराेली शहरातील अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. शासनाने याचवर्षी याेजना बंद केल्यास अनेकांना घरकुलापासून वंचित राहावे लागणार आहे. दिवसेंदिवस शहरात झाेपडपट्टी बांधून राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

३०० अर्जांच्या  छाननीची प्रक्रिया सुरू मुदतवाढ न मिळाल्यास ३१ मार्चनंतर अर्ज स्वीकारता येणार नाही. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत असल्याने शहरातील पात्र नागरिकांकडून फेब्रुवारी महिन्यातच अर्ज मागविण्यात आले हाेते. जवळपास ३०० अर्ज प्राप्त झाले. त्याचा डीपीआर बनवून म्हाडा मुंबई येथे पाठविण्यात आला आहे. हे अर्ज ३१ मार्चपूर्वीचे असल्याने त्यांना लाभ मिळणार आहे. 

-    शहरात घरकुलासाठी गावठाण किंवा स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली शहरातील गाेकूलनगर, इंदिरानगर हे वाॅर्ड सरकारी जागेवर अतिक्रमण करून वसली आहेत. अतिक्रमीत जागेवर या याेजनेचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे या वाॅर्डांमधील अनेक नागरिक याेजनेपासून वंचित आहेत. 

ग्रामीण भागातील नागरिकांप्रमाणेच शहरातीलही अनेक नागरिकांकडे स्वत:चे पक्के घर नाहीत. शहरात घर बांधण्याचा खर्च अधिक आहे. राेजी राेटी करणारा व्यक्ती शहरात घर बांधू शकत नाही. शासनाने याेजना बंद न करता ती चालू ठेवावी. स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न राहते. हे स्वप्न सरकारच्या सहकार्याशिवाय पूर्ण हाेेणे शक्य नाही. - स्वप्नील खाेब्रागडे, नागरिक

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना