शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

महोत्सवातून नागरिकांना रानभाज्यांची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 01:19 IST

वर्षा ऋतुमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या आरोग्यवर्धक व स्वस्त असल्या तरी या रानभाज्यांचे महत्त्व शहरी नागरिकांना माहित नाही.

तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व : चार हजारांच्या भाज्यांची झाली विक्री गडचिरोली : वर्षा ऋतुमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या आरोग्यवर्धक व स्वस्त असल्या तरी या रानभाज्यांचे महत्त्व शहरी नागरिकांना माहित नाही. या भाज्यांचे महत्त्व व ओळख निर्माण करून देण्याचे काम कृषी महाविद्यालयात गुरूवारी आयोजित रानभाजी महोत्सवाने केले आहे. या महोत्सवादरम्यान एकाच दिवशी चार हजार रूपयांच्या भाज्यांची विक्री करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे, सुधा सेता, आत्माच्या अधिकारी प्रीती हिरडकर, डॉ. वामण इंगळे, डॉ. वाघमारे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, प्रकाश गेडाम, प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. रानभाजी महोत्सवात सुमारे ३४ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचे सुमारे ६५ स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिले. डॉ. वामण इंगळे यांनी ज्या-ज्या ऋतूमध्ये जे-जे पिकते, ते सेवन करावे, त्यामुळे त्या ऋतूत शरीराला हानिकारक असलेल्या वातावरणापासून शरीराचा बचाव होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे ऋग्वेदात सांगितले आहे. रानभाज्या या पावसाळ्यात निघतात. पावसाळ्यात होणारे आजार थांबविण्याची शक्ती रानभाज्यांमध्ये आहे. मात्र रानभाज्या निर्जंतुक करण्यासाठी त्या जास्तीत जास्त शिजवाव्या, असा सल्ला दिला. भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. सदर भाजीपाला शरीरास हानिकारक आहे. मात्र शहरी नागरिकाला ही बाब माहित नाही. रानभाज्यांवर कोणत्याही प्रकारची कीटकनाशकांची फवारणी केली जात नाही. त्याचबरोबर पारंपरिक पालेभाज्यांच्या तुलनेत रानभाज्या स्वस्तात मिळतात. त्यामुळे पारंपरिक पालेभाज्यांना रानभाज्या चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. मात्र यासाठी रानभाज्यांचे महत्त्व शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. रानभाज्यांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. संचालन कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयक योगीता सानप यांनी केले. यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्रा. वाघमारे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मनोज इंगोले, डॉ. गणेश भगत, डॉ. शुभांगी अ‍ॅलेक्झांडर, डी. एन. अनोकार यांच्यासह कर्मचारी प्रशांत सराप, डॉ. विजय काळपांडे, संजय सरोदे, गणेश गणवीर, अजय घोंगडे, विवेक सातार, संतोष घोंगळे, योगेश चौके, गेडाम, मुरतेली, कांबळे, नरवाडे, सलामे, जाधव, भांडेकर, श्याम खुडे, रिंगनाथ व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी) महोत्सवात ३४ प्रकारच्या भाज्या रानभाजी महोत्सवात गडचिरोली, धानोरा, अहेरी, देसाईगंज, सिरोंचा, एटापल्ली, आरमोरी तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील महिला व बचतगटाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला होता. महोत्सवादरम्यान रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनवून ते चव घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर महिला मंडळी सदर भाजी कशी बनवावी, याबाबतही माहिती देत होत्या. महोत्सवात मुंगना, अरतफरी, केना, तरोटा, पातूर, लेंगडाभाजी, भस्वलची पाने, धोपा, हरदुलीची कांदे, कुळ्याचा फूल, कोलार, काटवल, भुकडी, शेरडिरे, खापरखुटीची भाजी, उतरण, कामुन्याची भाजी, वर, चेजची भाजी व मटारूचे पान आदी प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. महोत्सवादरम्यान तीन ते चार हजार रूपयांच्या भाज्यांची विक्री करण्यात आली. पळसाच्या पानाच्या पात्रामध्ये बनलेले पदार्थ ठेवून थाली सजविण्यात आली होती. मान्यवरांनीही या पदार्थांचा आस्वाद घेतला.