शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयएएस, आयपीएस व्हा

By admin | Updated: September 3, 2015 00:54 IST

आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन परिश्रम व जिद्दीच्या बळावर भविष्यात आयएएस व आयपीएस दर्जाचे अधिकारी बनावेत,

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : महाराष्ट्र दर्शन सहलीचा समारोपगडचिरोली : आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन परिश्रम व जिद्दीच्या बळावर भविष्यात आयएएस व आयपीएस दर्जाचे अधिकारी बनावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीच्या दहावी फेरीचा बुधवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) गणेश बिरादार उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, सहलीतील विद्यार्थ्यांना आरोग्य, शिक्षण तसेच इतर बाबतीत कोणत्याही समस्या निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय विभागास मदत मागावी, स्थानिक प्रशासकीय विभागाने कोणताही प्रतिसाद न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयात निसंकोचपणे मदत मागावी, दोन्ही कार्यालयाच्या वतीने अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासाही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी यावेळी दिला.आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहलीच्या दहावी फेरीमध्ये मुल-मुली मिळून ८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. बुधवारी सहलीवरून सदर विद्यार्थी गडचिरोलीत पोहोचले. या सहलीमध्ये पाच नक्षल पीडित कुटुंबांचे सदस्य व पाच नक्षल सदस्यांचे नातेवाईकही सहभागी होते. तर उर्वरित विद्यार्थीही जिल्ह्यातील दुर्गम भागातील होते. याप्रसंगी सहलीतील विद्यार्थी कमलू उसेंडी मनोगत व्यक्त करताना म्हणाला, आपण प्रथमच गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण तसेच उर्वरित महाराष्ट्र पाहिला. पहिल्यांदाच रेल्वे, मेट्रो रेल्वे, समुद्र, गेटवे आॅफ इंडिया आदी पाहून प्रचंड आनंदीत झालो. गायत्री उईके हिने सांगितले की, गडचिरोली आणि बाहेरील इतर जिल्ह्यात खूपच फरक आहे. आपल्याला मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात शिकून आयपीएस व्हायचे आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रगती झाली आहे, तशीच प्रगती शालेय शिक्षण घेऊन गडचिरोली जिल्ह्यात करण्याचा मानस गायत्री उईकेने यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, पोलीस विभाग गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील मुला-मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. याचा सकारात्मक परिणाम होत असून जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मुलांच्या विचारसरणीमध्ये चांगला बदल दिसून येत आहे. संचालन जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक पालवे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)