शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी सन्मान निधी’साठी अडथळ्यांची शर्यत सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:36 IST

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते.

ठळक मुद्दे५८३३ शेतकऱ्यांची माहिती अपुरी : ५२ हजार शेतकरी अजूनही लाभापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते. परंतू निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्याचे काम ठप्प पडले आहे. त्यातही ५८३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे बँक अकाऊंट आणि आधार क्रमांक जुळत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.या योजनेचा लाभ वर्षातून चार टप्प्यात दिला जाणार आहे. त्यात फेब्रुवारी ते मे या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत ६६ हजार ८६ शेतकरी कुटुंबियांचीच नावे एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड होऊ शकली. त्यांच्या बँक खात्यात शासन स्तरावरून २ हजार रुपयांची रक्कम जमा केली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पात्र असतानाही माहिती अपलोड होऊ न शकलेले ५२ हजार शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून दूर आहे.विशेष म्हणजे बँंक अकाऊंट नंबर किंवा आधार क्रमांक नसणाऱ्या ५८३३ शेतकरी कुटुंबियांपैकी ७७३ कुटुंबियांची माहिती दुरूस्त करून ती पोर्टलवर टाकण्यात आली आहे. परंतू माहिती अपलोड झालेल्या किती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला याची माहिती शासनाकडेच असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.जूनपासून दुसरा टप्पापहिल्या टप्प्यात २ हजार रुपये बँक खात्यात जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता जूनपासून पुढील चार महिन्यांचे २ हजार रुपये आणखी जमा होणार आहेत. मात्र ज्या पात्र शेतकरी कुटुंबियांची माहिती अद्यापही पोर्टलवर पोहोचू शकली नाही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयातून हे अपलोडींगचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.आचारसंहितेमुळे रखडले कामप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लोकसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या मिळावा यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी दिवस-रात्र एक करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली. परंतू सरकारी यंत्रणेकडून पहिल्या टप्प्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याआधीच आचारसंहिता लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतू आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने हे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.