शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘शेतकरी सन्मान निधी’साठी अडथळ्यांची शर्यत सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:36 IST

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते.

ठळक मुद्दे५८३३ शेतकऱ्यांची माहिती अपुरी : ५२ हजार शेतकरी अजूनही लाभापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते. परंतू निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्याचे काम ठप्प पडले आहे. त्यातही ५८३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे बँक अकाऊंट आणि आधार क्रमांक जुळत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.या योजनेचा लाभ वर्षातून चार टप्प्यात दिला जाणार आहे. त्यात फेब्रुवारी ते मे या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत ६६ हजार ८६ शेतकरी कुटुंबियांचीच नावे एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड होऊ शकली. त्यांच्या बँक खात्यात शासन स्तरावरून २ हजार रुपयांची रक्कम जमा केली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पात्र असतानाही माहिती अपलोड होऊ न शकलेले ५२ हजार शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून दूर आहे.विशेष म्हणजे बँंक अकाऊंट नंबर किंवा आधार क्रमांक नसणाऱ्या ५८३३ शेतकरी कुटुंबियांपैकी ७७३ कुटुंबियांची माहिती दुरूस्त करून ती पोर्टलवर टाकण्यात आली आहे. परंतू माहिती अपलोड झालेल्या किती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला याची माहिती शासनाकडेच असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.जूनपासून दुसरा टप्पापहिल्या टप्प्यात २ हजार रुपये बँक खात्यात जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता जूनपासून पुढील चार महिन्यांचे २ हजार रुपये आणखी जमा होणार आहेत. मात्र ज्या पात्र शेतकरी कुटुंबियांची माहिती अद्यापही पोर्टलवर पोहोचू शकली नाही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयातून हे अपलोडींगचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.आचारसंहितेमुळे रखडले कामप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लोकसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या मिळावा यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी दिवस-रात्र एक करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली. परंतू सरकारी यंत्रणेकडून पहिल्या टप्प्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याआधीच आचारसंहिता लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतू आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने हे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.