शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

‘शेतकरी सन्मान निधी’साठी अडथळ्यांची शर्यत सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:36 IST

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते.

ठळक मुद्दे५८३३ शेतकऱ्यांची माहिती अपुरी : ५२ हजार शेतकरी अजूनही लाभापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते. परंतू निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्याचे काम ठप्प पडले आहे. त्यातही ५८३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे बँक अकाऊंट आणि आधार क्रमांक जुळत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.या योजनेचा लाभ वर्षातून चार टप्प्यात दिला जाणार आहे. त्यात फेब्रुवारी ते मे या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत ६६ हजार ८६ शेतकरी कुटुंबियांचीच नावे एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड होऊ शकली. त्यांच्या बँक खात्यात शासन स्तरावरून २ हजार रुपयांची रक्कम जमा केली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पात्र असतानाही माहिती अपलोड होऊ न शकलेले ५२ हजार शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून दूर आहे.विशेष म्हणजे बँंक अकाऊंट नंबर किंवा आधार क्रमांक नसणाऱ्या ५८३३ शेतकरी कुटुंबियांपैकी ७७३ कुटुंबियांची माहिती दुरूस्त करून ती पोर्टलवर टाकण्यात आली आहे. परंतू माहिती अपलोड झालेल्या किती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला याची माहिती शासनाकडेच असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.जूनपासून दुसरा टप्पापहिल्या टप्प्यात २ हजार रुपये बँक खात्यात जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता जूनपासून पुढील चार महिन्यांचे २ हजार रुपये आणखी जमा होणार आहेत. मात्र ज्या पात्र शेतकरी कुटुंबियांची माहिती अद्यापही पोर्टलवर पोहोचू शकली नाही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयातून हे अपलोडींगचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.आचारसंहितेमुळे रखडले कामप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लोकसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या मिळावा यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी दिवस-रात्र एक करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली. परंतू सरकारी यंत्रणेकडून पहिल्या टप्प्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याआधीच आचारसंहिता लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतू आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने हे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.