शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
12
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
13
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
14
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
15
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
16
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
17
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
18
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
19
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
20
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मिरची तोडण्यासाठी गेलेले गडचिरोलीतील शेकडो मजूर अडकले तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:47 IST

मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देस्थानिकांचा त्रास वाढला लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतीची कामे संपत असल्याने रिकामे राहण्यापेक्षा मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जातात. यावर्षीही शेकडो मजूर मिरची तोडण्यासाठी गेले आहेत.दरम्यान केंद्र शासनाने २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच जिल्हा व राज्याच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे मिरची तोडणीसाठी गेलेले शेकडो मजूर तेलंगणा राज्यातच अडकले आहेत. मिरची तोडणीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही मजूर तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परत येण्याच्या तयारीत होते. मात्र लॉकडाऊन केल्यामुळे १४ एप्रिलपर्यंत ते घराकडे परत येण्याच्या आशा मावळल्या आहेत. देशात कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी आहे, त्यांना फोन करून आरोग्याबाबत विचारणा केली जात आहे. तर काही वयस्क मजुरांकडे फोनसुध्दा उपलब्ध नाही. अशांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.प्रशासन पुढाकार घेणार का?आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील देवानंद तागडे यांच्यासह १९ जण मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यातील माहदुदाबाद जिल्ह्यातील कुर्वी तालुक्यातील बिरिया तांडा या गावात मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर अजूनपर्यंत परत आलेले नाहीत. ज्या गावात मिरची तोडण्यासाठी नागरिक गेले होते, त्या गावातील नागरिक मिरची तोडणाऱ्या मजुरांना गावातून हुसकावून लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तेलंगणा सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेऊन त्या लोकांना गावात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आशिष तागडे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस