शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मिरची तोडण्यासाठी गेलेले गडचिरोलीतील शेकडो मजूर अडकले तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:47 IST

मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देस्थानिकांचा त्रास वाढला लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतीची कामे संपत असल्याने रिकामे राहण्यापेक्षा मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जातात. यावर्षीही शेकडो मजूर मिरची तोडण्यासाठी गेले आहेत.दरम्यान केंद्र शासनाने २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच जिल्हा व राज्याच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे मिरची तोडणीसाठी गेलेले शेकडो मजूर तेलंगणा राज्यातच अडकले आहेत. मिरची तोडणीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही मजूर तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परत येण्याच्या तयारीत होते. मात्र लॉकडाऊन केल्यामुळे १४ एप्रिलपर्यंत ते घराकडे परत येण्याच्या आशा मावळल्या आहेत. देशात कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी आहे, त्यांना फोन करून आरोग्याबाबत विचारणा केली जात आहे. तर काही वयस्क मजुरांकडे फोनसुध्दा उपलब्ध नाही. अशांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.प्रशासन पुढाकार घेणार का?आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील देवानंद तागडे यांच्यासह १९ जण मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यातील माहदुदाबाद जिल्ह्यातील कुर्वी तालुक्यातील बिरिया तांडा या गावात मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर अजूनपर्यंत परत आलेले नाहीत. ज्या गावात मिरची तोडण्यासाठी नागरिक गेले होते, त्या गावातील नागरिक मिरची तोडणाऱ्या मजुरांना गावातून हुसकावून लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तेलंगणा सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेऊन त्या लोकांना गावात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आशिष तागडे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस