शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मिरची तोडण्यासाठी गेलेले गडचिरोलीतील शेकडो मजूर अडकले तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:47 IST

मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देस्थानिकांचा त्रास वाढला लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतीची कामे संपत असल्याने रिकामे राहण्यापेक्षा मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जातात. यावर्षीही शेकडो मजूर मिरची तोडण्यासाठी गेले आहेत.दरम्यान केंद्र शासनाने २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच जिल्हा व राज्याच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे मिरची तोडणीसाठी गेलेले शेकडो मजूर तेलंगणा राज्यातच अडकले आहेत. मिरची तोडणीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही मजूर तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परत येण्याच्या तयारीत होते. मात्र लॉकडाऊन केल्यामुळे १४ एप्रिलपर्यंत ते घराकडे परत येण्याच्या आशा मावळल्या आहेत. देशात कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी आहे, त्यांना फोन करून आरोग्याबाबत विचारणा केली जात आहे. तर काही वयस्क मजुरांकडे फोनसुध्दा उपलब्ध नाही. अशांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.प्रशासन पुढाकार घेणार का?आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील देवानंद तागडे यांच्यासह १९ जण मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यातील माहदुदाबाद जिल्ह्यातील कुर्वी तालुक्यातील बिरिया तांडा या गावात मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर अजूनपर्यंत परत आलेले नाहीत. ज्या गावात मिरची तोडण्यासाठी नागरिक गेले होते, त्या गावातील नागरिक मिरची तोडणाऱ्या मजुरांना गावातून हुसकावून लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तेलंगणा सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेऊन त्या लोकांना गावात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आशिष तागडे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस